Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरुर शहरात तिरंगा यात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग भारत माता कि जयच्या जयघोष

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
समस्त राष्ट्रभक्त शिरूर व पंचक्रोशी ग्रामस्थ यांचा वतीने शिरूर शहरातून “तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . या यात्रेत मोठ्या संख्येने युवक माजी सैनिक व महिलांसह विविध राजकीय ,सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते .
ऑपरेशन सिंदूर मार्फत सेनेने केलेल्या अद्वितीय शौर्याच्या समर्थनार्थ शिरुर शहरातून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली . हातात तिरंगे ध्वज घेत पाउसाच्या सरी अंगावर झेलत भारत माता कि जय , वंदे मातारम च्या जयघोष करीत पाकिस्तान मुर्दाबादचा घोषणा यावेळी देण्यात आल्या .
शहारातील बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादना नंतर ही पदयात्रा जुन्या पुणे अहिल्यानगर महामार्गाने हुतात्मा स्मारक चौक (शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय जवळ) येथे आली .

यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचा वतीने शहिद झालेले सैनिक व दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले २८ पर्यटकांना हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात आले .
भाजपाचे जिल्हाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे , भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे , ॲड .मदनदादा फराटे
माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान शेळके , राजाभाउ मांढरे , प्रिया बिरादार , माजी नगरसेवक   विनोद भालेराव , माजी नगरसेवक संदिप गायकवाड , नाना पोटे , गणपतराव फराटे ,माजी सैनिक महादेव घावटे ,खंडु बो-हाडे , मेजर नामदेवराव घावटे , पाटीलबुवा पाचर्णे , नितीन थोरात ,बबनराव पवार, शिवाजी नाना कोहकडे, बंडू तात्या कोहकडे, दत्तात्रय वाखारे, बाळासाहेब शेवाळे, गोरख खेडकर, शिवाजी फलके , भरत  घावटे, खंडू बोऱ्हाडे, पडवळ, बबन पवार, शहाजी पवार, जे के कटके, रमेश जासूद, गोरक्ष गरुड , विठ्ठल जाधव, नंदकिशोर रोडे , भाऊसाहेब सोनवणे, नंदू सोनवणे,भाजपाचे माजी शहराध्यक्ष ललित नहार , केशवराव लोखंडे , ॲड .एकनाथ शेलार , विजय नरके , उमेश शेळके , बाबूराव पाचंगे ,प्राचार्य डॉ .समीर ओंकार , नीलेश नवले , सागर नरवडे ,हर्षद ओस्तवाल , कैलास सोनवणे , अविनाश जाधव , मितेश गादिया ,  अजित डोंगरे ,बाळू महाराज जोशी , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर आदी यावेळी उपस्थित होते .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने भावपूर्ण आदरांजली

यप्रसंगी बोलताना माजी कॅप्टन प्रभाकर थेउरकर म्हणाले की ऑपरेशन सिंधूर बंद झालेले नाही स्थगित आहे . युध्द आधिक झाले असते तर पाकिस्तान उध्वस्त झाले असते .
राष्ट्रपतीचे माजी अंगरक्षक माजी सैनिक विठ्ठल वराळ यांनी भारत पाकिस्तान व चीन युध्दाची माहिती दिली . ऑपरेशन सिंदूर द्ववारे भारताने सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिले . हा बदललेला भारत असल्याचे त्यांनी सांगितले .
नोटरी धर्मेंद्र खांडरे म्हणाले की भारतीय सौनिकांनी अवघ्या ९० मिनिटात पाकिस्तानला धडा शिकविला . भारत दहशतवादी कोठे ही असतील तर त्यांना धडा शिकवेल हा संदेश देण्यात आल्याचे खांडरे म्हणाले .
हाफीज बागवान यांनीही भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरी बद्दल सैन्याचे अभिनंदन केले .
भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे म्हणाले की ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून हा एक मोठा विजय जवानांनी मिळवला आहे. भारतीय जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “तिरंगा पद यात्रा काढण्यात आल्याचे ते म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button