महाराष्ट्र


मागील सात आठ महिन्यांपासुन शिरुर शहरामध्ये पाबळ फाटा ते पाषाण मळा रस्त्याचे काम चालु आहे. सदर काम हे डि.पी.च्या मंजुर नकाशाप्रमाणे होणे आवश्यक आहे . डि.पी. रस्ता हा 30 मीटरचा असूनही रस्त्यातच पावसाळी पाण्याचे आरसी गटार उभारण्यात आले आहे . भविष्यामध्ये रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे व त्यावेळी हे उभारलेले आर.सी.सी. गटार तोडावे लागेल यामुळे प्रशासन डी .पी .प्लॅन धाब्यावर बसवून पैसा गटारीत घालत आहे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
बनविण्यात येणारा रस्ता हा अंदाजपत्रकापेक्षा वेगळा आहे. भर पावसामध्ये डांबरीकरण व सिलकोट करण्यात येत . दिनांक ०७ जून २०२५ रोजी झालेल्या पावसामुळे मार्केटयार्ड समोरील व प्रितमप्रकाश नगर समोरील रस्त्यावर पाणीच पाणी साचल होते. मग बनविण्यात आलेल्या आर.सी.सी. गटारी या ‘पाणी वाहून नेण्यासाठी बनविल्या आहेत कि देखाव्याच्या आहेत .
गटारी कमी-जास्त उंचीच्या उभारल्या मुळे काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिरुर नगरपरिषदेने शासन निधीचे ७ कोटी रुपये भर पावसाळ्यात पाण्यात घातल्याचे निर्दशनास येत आहे. शिरुर नगरपरिषद वारंवार शासन निर्णयांची पायमल्ली करीत आहे.
रस्त्याच्या व आर.सी.सी गटारीच्या कामाची जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत चौकशी करण्यात यावी व शिरुर शहरात अंदाजपत्रकाला बगल देवून चाललेल्या रस्त्याच्या व आर.सी.सी. गटारीच्या काम करणा-या ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश द्यावेत अशी ही मागणी निवेद्नात करण्यात आली आहे .