महाराष्ट्रविशेष

शिरूर मध्ये शासकीय आधार केंद्रे बंद? नागरिकांची गैरसोय; भाजप महिला मोर्चाच्या प्रिया बिरादार यांची प्रशासनाकडे तक्रार

शिरूर, { डेलीन्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहर व तालुक्यातील अधिकृत शासकीय आधार केंद्रे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगून याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शिरूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या कडे देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारीनुसार, नवीन आधार नोंदणी तसेच आधार अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकृत केंद्रे बंद असल्याने नागरिकांना खाजगी सीएससी केंद्रांकडे वळावे लागत असून, या ठिकाणी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या संदर्भात बिरादार यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदन देत शिरूर शहर व तालुक्यातील सर्व अधिकृत आधार केंद्रांची अद्ययावत माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच या केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे का, संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची माहितीही सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व सीएससी केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या शुल्काचे फलक स्पष्टपणे दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली असल्याचे बिरादार यांनी सांगितले.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांसह भाजप महिला मोर्चाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button