विशेष

अपंग व्यक्तींना आपले जीवन सहजपणे जगता यावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण होणे गरजेचे : इक्किब्रिज फाउंडेशनच्या संस्थापक दिक्षा दिंडे

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}अपंग व्यक्तींना आपले जीवन सहजपणे जगता यावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. अपंगांच्या गरजा या केवळ अपंगांच्या नसून त्या संपूर्ण समाजाच्या आहेत, ही जाणीव ठेवून त्या पूर्ण केल्या तरच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक समाज साकार होईल, असे प्रतिपादन अपंग हक्क कार्यकर्त्या व इक्किब्रिज फाउंडेशनच्या संस्थापक दिक्षा दिंडे यांनी केले.

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात विद्यार्थिनी मंच व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने ‘निर्भय कन्या अभियान’अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘जागर नवविचारांचा’ या व्याख्यानमालेत ‘सर्वसमावेशक समाज घडविताना’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुनीता भोसले, सामाजिक कार्यकर्त्या राणी चौरे यांची उपस्थिती होती.√

दिंडे यांनी सांगितले की, अपंगत्व हे दिसणारे तसेच न दिसणारेही असते. ते जन्मतः येऊ शकते, तसेच अपघात, मानसिक धक्का, चुकीची औषधे, हिंसाचार, भांडणे, युद्ध अशा कारणांनीही कोणालाही येऊ शकते. अपंगांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. शारीरिक किंवा मानसिक कमतरता म्हणजे अपंगत्व.मुलींमध्ये अपंगत्व असल्यास शिक्षणासह अनेक बाबींमध्ये अडचणी वाढतात. तरीही शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठे अडथळे पार करावे लागतात. योग्य सामाजिक आणि शैक्षणिक पाठबळातून आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूच्या घटनांमागील कारणे समजून घेतली, तर सर्वसमावेशकतेकडे वाटचाल शक्य होते, असे त्या म्हणाल्या.

२०११ च्या जनगणनेनुसार देशातील अपंगांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २.२ टक्के (सुमारे २ कोटी ६८ लाख) होते. सध्या हे प्रमाण १० ते ११ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येत असून, अपघात, हिंसाचार, प्रदूषण आणि वाढते वृद्धत्व ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. याचबरोबर अपंगत्वाचे प्रकार सातवरून २१ झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“सर्वसमावेशक समाज हा केवळ अपंगांसाठी नाही, तर सर्वांसाठी असावा. आपण इतरांना कशी वागणूक देतो, यावरच सर्वसमावेशनाचा मार्ग ठरतो,” असे दिंडे यांनी नमूद केले. “आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजित चंदनशिवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button