महाराष्ट्रविशेष

शिरूरसाठी दिलासा; हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला पुढील ४० ते ४५ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची  चिंता दूर झाली आहे. उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.

५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे. या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ५५ दशलक्ष घनमीटर असून, सध्या तो पूर्ण क्षमतेने भरला आहे.

शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी विभागाच्या ६१ क्रमांकाच्या वितरिकेतून हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव शिरूर नगर परिषदेने पाठविला होता. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून घोडनदी पात्रातील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत होते. अखेर हा बंधारा पूर्ण भरल्याने शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शहरातील २६ हातपंप आणि कूपनलिकांच्या दुरुस्तीची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी जलस्रोतही उपलब्ध राहणार आहेत.

मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करण्याचे आव्हान आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button