महाराष्ट्रविशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.





