Uncategorizedराष्ट्रीयविशेष

एमईपीएल कंपनीच्या प्रदूषणा संदर्भातील निमगाव भोगी ग्रामस्थांचा विविध प्रश्नांवर निर्णय घेण्याकरीता पर्यावरण व उद्योग विभागाचे मंत्री व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत मुंबई येथे लवकरच बैठक

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) एमईपीएल कंपनीच्या प्रदूषणा संदर्भातील निमगाव भोगी ग्रामस्थांचा विविध  प्रश्नांवर निर्णय घेण्याकरीता पर्यावरण व उद्योग विभाग एकत्रित येईल व संबधित विभागाचे मंत्री व  माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत मुंबई येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर चर्चा करण्यास तयार असून शेतक-यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही   उद्योग मंत्री डॉ .उदय सामंत यांनी शिरुर येथे दिली.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र इन्व्हॉयरो पॉवर लि. कंपनीचा प्रदूषणामुळे निमगाव भोगी परिसरात  शेतीचे होत असलेल्या नूकसानीची पाहणी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उद्योग मंत्री  डॉ .उदय सामंत , खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी निमगाव भोगी परिसरातील करंजाई मळा ,   परिसराची पाहणी करुन  केली . माजी आमदार काकासाहेब पलांडे , ॲड . अशोक पवार ,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर , बाजार समितीचे माजी सभापती  देवदत्त निकम , विकास लंवाडे , उषादेवी बढे , पांडुरंग थोरात , विठ्ठल घावटे ,  प्रकाश थोरात आदी उपस्थित होते .उद्योग मंत्री डॉ .उदय सामंत म्हणाले की  शेतक-यांचा संदर्भात कोणी मनमानी करत असेल तर त्याला चाप लावला जाईल .आज या परिसरात भेट देण्यासंदर्भात आलो असता  कंपनीने तात्पुरती डागडूजी केल्याच लक्षात येते . औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रदूषणा वर निर्णायक भूमिका घेण्यात येईल . कंपनीचा प्रदूषणा संदर्भातील सॅपल लॅब मध्ये बदलले जातात . आगामी काळात याबाबत दक्षता घेण्यात येईल . कंपनीचा पदूषणामुळे परिसरातील शेतजमिनी , जनावरे , पाणी याचे जे नूकसान झाले . त्यासंदर्भात कंपनीस नूकसान भरपाई देण्यास सांगू असे आश्वासन त्यांनी दिले .शरद पवार म्हणाले की कंपनीच्या प्रदूषणाचा परिणाम पाणी, जमिन , पीक , जनावर यांच्यावर होत आहे . जमिनीचा पोत बिघडत आहे . निमगाव भोगी सह परिसरातील अन्य गावात कंपनीचा प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुंबई येथे पर्यावरण व उद्योग मंत्री यांची बैठक होत असून या बैठकीस आपण हजर राहणार आहोत. या कंपनीसाठी नव्याने देण्यात आलेली जमीन एमआयडीसीने रद्द करावी व शेती जनावरे जमिनीचे चे नूकसान झाले आहे त्याची नूकसान भरपाई कंपनीने एकरी  द्यावी अशी मागणी पवार यांनी केली . शेत जमिन उध्वस्त झाली तर जगायचे कसे. जिथे शेती उध्वस्त झाली त्या शेत जमिनीचा मालकांना एकरी नूकसान भरपाई द्यावी अशीही  मागणी पवार यांनी केली या विषयात राजकारण नको असे ही आवाहन त्यांनी केले .

खासदार डॉ . अमोल कोल्हे म्हणाले की रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील या कंपनीचा प्रदूषणाचा विषय संसदेत मांडला. कंपनीचा प्रदूषणामुळे शेती जनावर पीके व पाण्यावर परिणाम होत आहे. कंपनीचा परिसरातील पाण्याचा टीडीआर आधिकचा आहे. कंपनीचे काम स्वच्छ असेल तर कंपनीस प्रयोगशाळेत सॅपल बदलण्याची वेळ आली नसती .  पाणी व माती पुनरुजीवनाची जबाबदारी कंपनीने घ्यावी असे ही कोल्हे म्हणाले .निमगाव भोगीच्या सरपंच ज्योती सांबारे म्हणाल्या महाराष्ट्र इन्व्हॉयरो पॉवर लि. (एमईपीएल) कंपनी बंद करावी . या कंपनीचा प्रदूषित पाण्यामुळे निमगाव भोगी परिसरातील शेती नापीक होत असून जनावरे ही दगावले जात आहे . ही कंपनी राज्यभरातील घातक व विषारी  कचरा संकलित करते . या कचरावर प्रक्रिया करुन या कचराची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना कंपनी त्यावर कोणतीही कारवाई न करता ते जमिनीत गाडले जातात. १७  वर्षापासून कंपनीचा विरोधात लढा देत असून ही कंपनी बंद करावी अशी मागणी त्यांनी केली. कंपनीला विस्तारासाठी दिलेले क्षेत्र रद्द करावे .कंपनीचा प्रदूषणामुळे गाव उध्दवस्त होण्याची वेळ आली आहे असे त्या म्हणाल्या .

दरम्यान स्थानिकांनी यावेळी सांगितले की कंपनीच्या पाण्या मुळे येथील शेत जमिनी उध्वस्त झाल्या. कंपनीपूर्वी येथील पाणी आम्ही प्यायचो.आज हे पाणी जनावरे व माणसे पिऊ शकत नाही. पाण्या मुळे खाज येते.जनावरे मृत्युमुखी पडत आहे . या शेत जमिनीची विक्री होत नसल्याचे व्यथा व्यक्त करत ही कंपनी बंद करावी अशी मागणी केली .सरपंच लत्ता कर्डिले  , माजी सरपंच उत्तम व्यवहारे , भीमराव रासकर  , पांडुरंग थोरात आदीची भाषणे झाली.

               चौकट

चिंता करु नका , या प्रश्नावर मार्ग निघेल व मी पुन्हा येथे येईल

   शरद पवार मागील महिन्यातच या परिसराची पाहणी करणार होते पण तो दौरा रद्द झाल्यावर आज सकाळीच ते आवर्जून या परिसरात आले . उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या समवेत एकत्रितपणे त्यांनी प्रदूषित ओढ्याचे पाणी, प्रदूषणामुळे खराब झालेल्या शेत जमिनी यांची पाहणी केली . त्याच बरोबर शेतक-यांशी संवाद साधत असताना उद्योग मंत्री डॉ . उदय सामंत यांना स्टेजवरुन उभे राहून स्टेजचा समोरील बाजूस एमईपीएल कंपनीचे कचराचे ढीग त्यांनी दाखविले .त्याच बरोबर कंपनीचा प्रदूषणासंदर्भात मार्ग काढू तुम्ही चिंता करु नका अश्या शब्दांत शेतक- यांना आश्वासित करुन हा प्रश्न मार्गी लागण्यानंतर मी पुन्हा येईल असे ही आवर्जून त्यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button