विशेष

शिरूरच्या ऐतिहासिक व राजकीय ओळखीचा साक्षीदार असलेला पाच कंदील चौक आता नव्या रूपात झळकणार.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूरच्या ऐतिहासिक व राजकीय दृष्टा महत्वाचा त्याच् बरोबर शहरातील विविध महत्वाचा घटनाचा साक्षीदार असणारा पाच कंदील चौकाचे रुपडे पालटणार असून याचौकाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. आगामी दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.

शिरूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पाच कंदील चौकात अनेक राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा विधानसभा, लोकसभा व नगरपालिका निवडणुकीनिमित्त झाल्या असून अनेक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, प्रमोद महाजन, प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष रसिकलाल धरिवाल यांच्या सह अन्य पक्षाच्या दिग्गज नेत्याच्या सभाच्या साक्षीदार हा चौक आहे. त्याच बरोबर प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके ही याठिकाणी येऊन गेले असून प्रसिद्ध गायक अजय अतुल यांनी ही बालपणी या चौकात पोवाडा गायन केलेले आहे. काही चित्रपटांचे शूटिंग या चौकात झालेले आहे.शिरूर शहराच्या जीवनात पाच कंदील चौकास महत्वाचे स्थान आहे.

याबाबत अधिक माहिती नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी दिली.यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती सुनील जाधव, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती एजाज बागवान, नगरसेवक अभिजित पाचर्णे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष पाचर्णे म्हणाल्या की शहरातील महत्वाच्या असणा-या पाच कंदील चौकाचे ६० लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असून सुशोभीकरणात यापरिसरात काँक्रटीकरण करण्यात येणार आहे. कडेला पदपथ करण्या बरोबरच पोल लावण्यात येणार आहे.त्याच बरोबर मधल्या पोलवर पाच दिवे लावण्यात येणार असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.

दरम्यान उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी सांगितल की शिरूर शहरातील ऐतिहासिक बाजार पेठ असलेले पाच कंदील चौक सुशोभीकरण विकास काम सुरू होण्यापूर्वी तेथील नागरिक तसेच व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकार्‍यांना समवेत भेट घेऊन विस्तृत संवाद सत्र पार पडले. ह्या संवाद सत्रामध्ये पार्किंग, कचरा व्यवस्थापन , महावितरणचे असलेले ओव्हरहेड वायरचे जाळे आणि इतर स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत सुशोभीकरणाचे विकास काम करताना नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून अधिकार्‍यांना सुचना देण्यात आल्या तसेच सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन परिसर अधिक स्वच्छ, सुटसुटीत आणि सुंदर करण्यासाठी ठ पावले उचलली जातील असे गादिया म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button