Uncategorizedराष्ट्रीय

शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व तरकारी बाजार दिनांक ४ जून पासून सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस भरणार

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व तरकारी बाजार दिनांक ४ जून पासून सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस भरविण्यात येणार असल्याची माहिती शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीचा वतीने देण्यात आली आहे .
याबाबत बाजार समिती प्रशासनाने पत्रक जाहिर केले आहे .
शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीचा शिरूर येथील मार्केट यार्डवर भरणारा शेतकरी बाजार (भाजीपाला व तरकारी) यार्डवर शेतमाल विक्री करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रविवार दि.१३ एप्रील २०२५ पासून दररोज पहाटे ४.१५ ते ८.१५ वाजेपर्यंत सुरू करणेत आलेला होता. परंतु मध्यंतरीचे कालावधीत काही शेतकऱ्यांनी बाजारची वेळ पुर्वीप्रमाणे संध्याकाळची करावी तसेच काही शेतकऱ्यांनी आत्ता सुरू आहे तसाच पहाटे बाजार सुरू ठेवावा असे कळविलेले होते. त्यानुसार दि. २२ मे २०२५ रोजी शेतकरी प्रतिनिधीसोबत झालेल्या चर्चेनुसार भाजीपाला व तरकारी बाजारची वेळ आत्ता सुरू असलेप्रमाणे पहाटे ४.१५ ते सकाळी ८.१५ या वेळेमध्ये नेहमीच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्केट मधील जागेत व संध्याकाळी ६.०० ते रात्री ८.०० या वेळेमध्ये नवीन मार्केट यार्डमध्ये असणाऱ्या जुन्या वजनकाट्याशेजारील जागेत भरणार आहे. दिनांक ४ जून पासून दोन्ही वेळेस बाजार भरणार आहे .त्यामुळे शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी मार्केट यार्डवर येणाऱ्या शेतकरी, खरेदीदार यांनी वेळेमध्ये यार्डवर उपस्थित रहावे . दिलेल्या वेळेअगोदर कोणासही यार्डवर प्रवेश दिला जाणार नाही. दिलेल्या वेळीच बाजार समितीचे गेट उघडणेत येऊन शेतकरी, खरेदीदार यांना यार्डवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे
प्रशासनाचा वतीने सांगण्यात आले आहे .
दरम्यान शेतकरी कृती समितीचे नाथाभाउ पाचर्णे म्हणाले की शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 13 एप्रिल 2025 पासून दररोज पहाटे बाजार सुरू केला होता.सदर बाजार टायमिंग मुळे शेतकर्यांना शेतमाल विक्री करताना योग्य बाजारभाव मिळत नव्हता तसेच शेतकरी बांधवांना भाजीपाला विक्री साठी आणताना अनेक समस्या येत होत्या.
याला शेतकरी कृती समिती तर्फे शिरूर-पारनेर-श्रीगोंदा येथील शेतकरी बांधवांनी दिड महिना मोठ्या संयमाने लढा दिला . या शेतकरी कृती समितीच्या लढ्याला अखेर यश येऊन दिनांक ४ जुन पासून शेतकरी बाजार हा संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत नवीन मार्केट यार्डमध्ये जुन्या वजनकाट्या शेजारी भरणार आहे .सदर लढ्यासाठी शिरूर -पारनेर-श्रीगोंदा येथील शेतकरी बांधवांनी जो दिड महिना मोठ्या संयमाने शेतकरी कृती समितीच्या मागे भक्कम पणे उभे राहुन साथ दिली त्यामुळे हे यश मिळू शकले. सद्य स्थितीला शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन्ही टायमिंगला बाजार भरवण्याचे निश्चीत केलेले आहे. शेतकऱ्यांना बाजार समिती मध्ये कुठलीही समस्या असल्यास
शेतकरी कृती समिती शिरूर -पारनेर-श्रीगोंदा तालुका शी संपर्क साधण्याचे आवाहन पाचर्णे यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button