विशेष

भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवचे आयोजन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
संक्रांत म्हटली की तिळगुळासोबतच रंगीबेरंगी पतंगांची आठवण हमखास येते. या आनंदाला सामाजिक भानाची जोड देत शिरूरमध्ये एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवात निराधार व अनाथ बालकांसोबत संक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरच्या कार्याध्यक्षा व रसिक विचार मंच शिरुरच्या सदस्या प्रा . डॉ . क्रांती पैठणकर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छत्रालयातील तसेच परिसरातील विविध अनाथ आश्रमांतील तब्बल १२० बालकांनी या पतंग महोत्सवात सहभाग घेतला. रेणुका माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात रंगलेल्या या सोहळ्यात बालगोपाळांची लगबग, आकाशात झेपावणाऱ्या पतंगांची चढाओढ आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून परिसर भारावून गेला होता.
यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. अनाथ बालकांना आनंदाचे क्षण देण्याचा हा प्रयत्न सर्वांच्याच मनाला स्पर्शून गेला. कार्यक्रमास शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, नगरसेवक सागर नरवडे, खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ शेख, सीमा सपकाळ, बंडू दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या उपेक्षित घटकांची जाण ठेवून भूमिपुत्र प्रतिष्ठान राबवत असलेले उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले. या सोहळ्याचे आयोजन भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केले असून मनशांती छत्रालयाचे व्यवस्थापक विनय सपकाळ यांनी आभार मानले.
उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या प्रेरणेने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, अशा उपक्रमांतून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न असल्याचे सुशांत कुटे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button