Uncategorized

पाण्यात वाहून गेलेल्या युवकांचा शोध सुरु

शिरूर दिनांक { डेली न्यूज पोस्ट टीम _२४ }निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी ओढ्या वरील पुलावरून जात असताना तोल जावून पाण्यात पडलेल्या तरुणांचा शोध अद्याप पर्यत लागला नसुन उद्या सकाळी पुन्हा युवकांचा साठी शोध मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली.

मागील दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील सर्वच भागात पाऊसाने हजेरी लावल्याने नद्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.
निमगाव म्हाळुंगी गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरज अशोक राजगुरू हा ३० वर्षीय तरूण काल रात्री तोल जावून ओढ्यातील प्रवाहात जोरात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती मित्र पथक, स्थानिक नागरिकांनी युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. रात्री अंधारामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता.पोलीस, अग्निशमन दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे ओढ्याच्या पात्रात तरूणाचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु अद्याप पर्यत तरुणाचा शोध लागला नाही.
पीएमआरडीएच्या आपत्ती निवारण मदत पथक ही घटनास्थळी दाखल झाले होते. व युवकांचा शोध घेत होते.
अंधार व पाण्यात असलेले काटेरी झुडपे यामुळे आज रात्री शोध कार्य थांबविण्यात आले असून उद्या पुन्हा १७ संप्टेबर रोजी शोध कार्य सकाळी सुरु करण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हस्के यांनी सांगितले.
दरम्यान युवकांचा शोध न लागल्याने युवकांचे कुटूंबिय व ग्रामस्थ चिंतेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button