






गुंतवणूक ही अल्पकालीन नव्हे तर दीर्घकालीन दृष्टीकोनातून करावी लागते. त्यासाठी संयम, सातत्य आणि नियोजन या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले तर आभार प्रा. चैतन्य वाघ यांनी मानले. कार्यक्रमास क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.