Uncategorizedविशेष

आपल्या असामान्य कर्तुत्वातून स्वंत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजिका ,आदर्श सरपंच व सेवाभावी वृत्तीने सतत समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे ( पोटावळे )यांचा जन्मदिन १३ मे रोजी आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्याच्या जीवनप्रवासचा आढावा

आपल्या असामान्य कर्तुत्वातून स्वंत:ची  वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तर्डोबाचीवाडी   येथील उद्योजिका ,आदर्श सरपंच व सेवाभावी वृत्तीने सतत समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे( पोटावळे )यांचा जन्मदिन १३ मे रोजी आहे त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ग्रामीण भागातील वर्षा काळे यांनी  उद्योजक म्हणून केलेला प्रवास हा तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे .वर्षा यांचे वडील उल्हासराव हे शिक्षक होते. वडिलांनी केलेले मार्गदर्शन व संस्कार यातून वर्षा या घडत गेल्या. प्रतिकूल परिस्थिती आली तरी डगमगायचं नाही. त्याला तोंड द्यायचं व यशाच्या मार्गाकडे वाटचाल करत राहायचं या प्रमाणे वर्षा  काळे यांचा जीवन प्रवास राहिलेला आहे .ग्रामीण भागातली एक मुलगी तर्डोबावाडीचे सरपंच म्हणून काम करते सरपंच म्हणून  केलेल्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात येते . त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांना रोजगार मिळावा त्यांना आर्थिक समृद्धी व स्वावलंबी होता यावं या हेतूने वर्षा काळे यांनी  उद्योग क्षेत्रात प्रवेश केला .आज रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत सरदवाडी ,शिरुर  या ठिकाणच्या त्यांच्या युनिट मधून अडीचशे हुन अधिक महिला व २०० हून आधिक पुरुष काम करतात. राजकारण समाजकारण ,अर्थकारण या सर्वच क्षेत्रात त्या सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या या वाटचालीत त्यांचे पती माजी सैनिक उद्योजक फक्कडराव काळे  , आई , बहीण व भाउ यांची खंबीर साथ आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण करताना वर्षा यांनी  आपल्या कुटुंबालाही वेळ देत कुटुंबालाही घडवले .त्यांचे चिरंजीव उच्चविद्याविभूषित असून   कंपनीची जबाबदारी ते  स्वंत : सांभाळतात .तर कन्या उच्चशिक्षित होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचबरोबर त्यांनी नुकतीच शैक्षणिक संस्था स्थापन केली असून या शैक्षणिक संस्थेद्वारे नर्सेसचे कोर्सेस सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर भविष्यात शिरूर परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे शैक्षणिक संकुल उभे करून विविध कोर्सेस व शिक्षणक्रम शिरूर परिसरात त्यांना सुरू करायचे आहेत त्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे.

वर्षा काळे या नावाचा उल्लेख होताच डोळ्यांसमोर एक सक्षम, धडाडीची, जनतेच्या प्रश्नांशी नातं सांगणारी आणि विकासाच्या संकल्पनेला कृतीत उतरवणारे  नेतृत्व  उभे राहते. त्या  सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आल्या आहेत .सरपंच म्हणून त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात झाली, पण त्यांनी आपले कार्य केवळ गावापुरते मर्यादित ठेवले नाही, तर संपूर्ण परिसरात  समाजहिताच्या कार्यासाठी आपली छाप सोडली. लोकनेते आमदार बाबुरावजी पाचर्णे  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तर्डोबाचीवाडी  या गावचे सरपंच म्हणून काम करत असताना वर्षा काळे यांची त्यांच्या कार्यातून  ओळख   आदर्श सरपंच म्हणून झाली. त्यांनी आपल्या गावात  स्वच्छता अभियान, ग्रामविकास योजना, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ आणि युवकांसाठी व महिलांसाठी  रोजगारनिर्मिती व विविध योजना अशा अनेक उपक्रमांनी त्यांनी आपल्या गावात सर्वांगीण विकास घडवण्या साठी पाठपुरावा केला . ‘गावकर्‍यांचा विकास, गावाच्या सहभागातून’ या संकल्पनेद्वारे लोकसहभाग वाढेल या दृष्टीने काम केले.

सरपंचपदाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर वर्षा काळे यांनी उद्योगाच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं. त्यांनी ग्रामीण महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने उदयोग व्यवसायाची  मुहूर्तमेढ केली. महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराची संधी दिली. महिलांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं.

मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्यांमध्ये वर्षा काळे यांचं नाव अग्रगण्य आहे. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्यांवर अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिका घेतली. आरक्षणाचा प्रश्न, शिक्षण व नोकरीतील संधी, या वर काम केले. समाजाचा विविध प्रश्न मार्गी लावण्यसाठी  मोर्चे, बैठका आणि आंदोलनाचा माध्यमातून काम केले .
    वर्षा काळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून देखील आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या.  त्यांनी महिलांमध्ये राजकीय जागरूकता वाढवली, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि भाजपाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या वक्तृत्वशैली , नेतृत्वगुण आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे.
 वर्षा काळे यांचा जीवनप्रवास हा फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही, तर तो एका सामान्य महिलेला असामान्य बनवणाऱ्या प्रेरणादायी वाटचालीचे उदाहरण  आहे. त्यांनी ग्रामीण भागात महिलांना पुढे आणण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. त्यांनी ‘स्त्री सक्षम झाली तर समाज सक्षम होतो’ हा संदेश आपल्या कार्यातून दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांनी आपल्या पायावर उभं राहून स्वतःच्या कुटुंबाला आधार दिला.
वर्षा काळे या केवळ एक नेत्याच नाहीत, तर त्या एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून नेतृत्व, दूरदृष्टी, समाजसेवा आणि महिलांसाठी जिव्हाळा या साऱ्यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळते. आजच्या पिढीतील तरुण आणि महिला वर्गासाठी त्या एक आदर्श आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून अनेकांनी समाजसेवेची दिशा स्वीकारली आहे. त्यांच्या कार्याने एक नवा अध्याय लिहिला गेला असून, भविष्यात त्यांचं कार्य आणखी विस्तारत जाईल, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button