Uncategorized

निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखणे गरजेचे – ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड

oplus_131074

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24 )विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी निसर्ग आणि विकास यांचा समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी मिळविण्याचा हक्क  असून त्याची जपणूक करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ व माजी अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा बार कोन्सिल डॉ. सुधाकरजी आव्हाड यांनी व्यक्त केले.शिरूर येथील बागवान नगर परिसरातील नोटरी रवींद्र खांडरे यांच्या कार्यालयास आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी खांडरे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आव्हाड यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले

.ते म्हणाले की, सध्याच्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेत प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध कायदे आणि नियमावली लागू केल्या असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायुप्रदूषण प्रतिबंधक कायदे यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. नागरिकांनीही या कायद्यांची माहिती घेऊन आपले हक्क आणि कर्तव्ये ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास नोटरी विलास खांडरे,  अथर्व रवींद्र खांडरे,शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद, नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप बारवकर, सामाजिक कार्यकर्ते भरत कालेवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, रवि लेंडे, ‘आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे रविंद्र सानप, पुष्कराज पोटावळे, शिवसेनेचे नेते कैलास भोसले, आनंद नागरी पतसंस्थेचे संचालक देवल शहा, अविनाश घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नोटरी रवींद्र खांडरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभणे ही शिरूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी नोटरी विलास खांडरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button