
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम- 24‘}वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील रयत शाळेच्या मैदानावर हजारो विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचे सर्व कडव्यांसह सामूहिक गायन केले. “वंदे मातरम्, भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात तालुकास्तरीय शासकीय समिती स्थापन करण्यात आली होती. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के अध्यक्ष तर संतोष गोसावी सचिव होते.




माजी सैनिकांच्या वतीने देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले.
यात विदयाधाम प्रशाला, रसिकलाल माणिकचंद इंग्लिश मिडीयम व ज्युनियर कॉलेज, ज्ञानगंगा विद्यालय, जीवन विकास मंदिर, गुरुवर्य शंकरराव भुजबळ विद्यालय, सूर्यकांत पलांडे ज्युनियर स्कूल, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज आणि शासकीय आयटीआय कारेगाव या संस्थांचा समावेश होता.
.येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सामुदायिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री व्हि डी कुलकर्णी, श्री. गणेश मराठे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, शिक्षक प्रतिनिधी सौ. जयश्री दांडगे, पूर्व प्राथमिक शाळा समन्वयक सौ. डायना बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री. सखाराम पुरी यांनी वंदे मातरम् निर्मितीचा इतिहास तसेच वंदे मातरम् गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. शाळेचे प्राचार्य डॉ समीर ओंकार यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरम् चे महत्व विषद केले. श्री. व्हि डी कुलकर्णी यांनी राष्ट्र भक्तीने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी समर्पित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ. प्रिया नरवडे यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी साडे पाचशे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् चे सामुदायिक गायन केले.