राष्ट्रीयविशेष

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात जनता दल धर्मनिरपेक्ष प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम-24 }शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.यासंदर्भात शेवाळे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले. शिरूर तालुक्यासह परिसरात बिबट्यांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.

मागच्या १५ दिवसांत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील शिवन्या बोंबे या बालिकेचा आणि भागुबाई जाधव या आजींचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शेवाळे यांनी या निवेदनाद्वारे वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गेल्या ५ वर्षांमध्ये बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.आणि १५ हजारहून अधिक पशुधनाची हानी झाली असून यामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनांमुळे शिरूर तालुक्यासह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. तरी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधितांस बैठकीचे आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे शेवाळे यांनी वनमंत्री यांच्या कडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button