Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीयविशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आषाढी एकादशीनिमित्त शिरूर शहरातील विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष, अभंग, भक्तिगीते, रिंगण सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलांची प्रतिमा आणि “माऊली” या शब्दाची अक्षररचना करून अनोखा उपक्रम राबविला.यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे , उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सभापती डॉ. सुनिता पोटे, सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्ननाली जामदार शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, शाळा समितीचे अध्यक्ष शिरीषकुमार बरमेचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. “वारी स्वच्छतेची” हा संदेश देत त्यांनी शाळेतील स्वच्छता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचेही कौतुक केले.






