शिरूर, ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
संपत्ती निर्माण करणारी लोकसंख्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून समाजाशी भागीदारी करत विकासची प्रक्रिया गतीमान करावी असे सांगून भारत येत्या काही वर्षात पुन्हा सुवर्ण भूमी होणार असल्याचा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठा तील सेवानिवृत्त प्रा. दीपक गायकवाड यांनी व्यक्त केला.

शिक्षक दिन व श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट शिरूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डेक्कन स्कुल शिरूर येथे शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य व शास्त्रज्ञ डॉ. के.सी.मोहिते, रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या

घारू यांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करताना

मुख्याध्यापिका अश्विनी घारू, रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल येथील शिक्षक दत्तात्रय बंडू शिंदे, बीकेसी प्रीपायरी स्कूल मुक्ताईनगर येथील मनीषा चौधरी, या शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. दीपक गायकवाड, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपसरपंच गणेश खोले,ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, रणजित गायकवाड, अमोल. काळे शरद परदेशी, सिंकदर मण्यार, शिवसेनेच्या नेत्या विजया टेमगिरे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, गायक गणेश मराठे,आदी उपस्थित होते.


आगामी काळ ज्ञानाचा व माहितीचा असणार असून ज्ञान हे मोती आहे. लोकसंख्या ही संपत्ती निर्माण करणारी असली पाहिजे. समाजाशी भागीदारी करून विकास करणे गरजेचे आहे.
भारत विकासाचा मार्गावर असून भारत पुढील काही वर्षात पुन्हा सोन्याची भुमी होणार आहे.आनंदाची पातळी मोठी असणे हे समाधानाचे लक्षण आहे.निर्मितीचा आनंद हा सर्वोच्च असतो. आगामी काळ भारताचा आर्थिक वाढीचा काळ असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. विविध कौशल्ये एकाच वेळी आत्मसात करा असा सल्ला गायकवाड यांनी दिला.


मंडळाने तीसहून अधिक शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.