राष्ट्रीयविशेषसांस्कृतिक

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाजाने पुढे यावे : प्रवीण तरडे

मुळशी पॅटर्न १’च्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात; शिरूरमध्ये ‘देऊळ बंद भाग 2’ निमित्त संवाद

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शेतकरी आत्महत्या हा केवळ सरकार किंवा प्रशासनाचा विषय नसून तो आपल्या प्रत्येकाच्या घरातील प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने एकत्र येत संवेदनशीलतेने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन अभिनेते व निर्माता प्रवीण तरडे यांनी केले. पुढील आठवड्यापासून ‘मुळशी पॅटर्न १’ या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सध्या प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद भाग १’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे व चित्रपटातील सहकारी कलाकार रमेश परदेशी, केदार सोमण, अतुल कुडले, वैभव आगाव, सुनील पालकर, सागर पाठक शिरूर येथील बाबुराव नगरमधील डीजे गोल्ड चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी प्रेक्षकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमास डी जी गोल्ड शिरूरचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड, ॲड .सागर गायकवाड, ॲड .बाबुराव पाचंगे, रवि लेंडे , सुशांत तायडे आदी उपस्थित होते.

प्रवीण तरडे म्हणाले, “हार, तुरे, शाल आणि बुके यांची परंपरा आता बंद करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काहींना पाहुण्यांसाठी नारळ घेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो.”

“एका बुकेसाठी किंवा शालीसाठी खर्च होणारे ३०० रुपये एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठी मदत ठरू शकतात. दिखाव्यावर खर्च करण्याऐवजी माणसांशी संवाद वाढविणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

ईशिता संतोष धुमाळ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले. “आपल्या आसपासचा माणूस दुःखी आहे का, तो कमी बोलतोय का, जेवत नाही का, त्याच्या वागण्यात बदल झाला आहे का, हे कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर प्रेमाने ठेवलेला हातही आत्महत्या थांबवू शकतो, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे,” असे त्यांनी सांगितले.

“माणूस गेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला जाण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याच्या अडचणी समजून घेणे अधिक गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न समाजानेच सोडवला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी चित्रपटांविषयी बोलताना तरडे म्हणाले, “ग्रामीण भागाशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे. मी स्वतः ग्रामीण भागातून आलो असल्याने गावोगावी फिरून लोकांशी संवाद साधतो. त्यामुळे आपुलकी वाढते आणि मराठी चित्रपटांविषयी सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. ‘देऊळ बंद भाग १ ’ हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा चित्रपट आहे.”

यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button