Uncategorizedविशेष

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त प्रबोधनत्मक कार्यक्रम व तंत्र नाविन्यता प्रदर्शनाचे आयोजन

  • oplus_131074

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
३५१ व्या शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त तात्या टोपे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे व तंत्रनाविन्यता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलन
मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील सेवानिवृत सचिव देवेंद्र पांडूरंग कोळपकर , प्राचार्य संतोष गोसावी , उपप्राचार्य दिनकर जाधव , निवेदक संतोष झंजाड आदी उपस्थित होते . प्रा.बबनराव उकिर्डे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
यावेळी देवेंद्र पांडुरंग कोळपकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजही उपयुक्त आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांनी आत्मनिर्भयतेला प्राधान्य दिले .भारत देशाची महासत्ता होण्याचा दिशेने वाटचाल सुरु आहे .कुटुंबव्यवस्था प्रबळ असेल तर राष्ट्र प्रबळ बनेल .ज्या देशात स्त्रीला सन्मान असतो तो देश पुढे जातो असे ते म्हणाले . मतृभाषेतून शिक्षण घेतले तर शिक्षणाचा पाया भक्कम होतो असे ही ते म्हणाले .कुटुंब व्यवस्था डळमळीत होत असल्याने कौटुंबिक हिंसा वाढत असल्याचे ते म्हणाले .
प्रा. बबनराव उकिर्डे यांनी सांगितले
आयटीआय शिरुरच्या समस्या सोडविण्यास कटिबध्द असल्याचे ते म्हणाले . आयटीआयतून कुशल मनुष्यबळ निर्माण करायचे आहे .राज्यातील आयटीआयला वेगळी ओळख करुन देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे .
कार्यक्रमाचा सुरुवातीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवराज्यभिषेक दिनाचा संदेश दाखविण्यात आला .
याप्रसंगी अमित परदेशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पवार यांनी केले .सूत्रसंचालन संतोष झंजाड यांनी केले आभार माधव गायकवाड यांनी मानले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button