Uncategorizedविशेष

नोकरशाही व लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती

: राज्याचे माजी सचिव महेश झगडे

oplus_131106

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
लोकप्रतिनिधी व नोकरशाही यांची अभद्र युती वाढत चालली असून ती सक्षम होत आहे ही युती थांबविता येईल हे नागरिकांनी पाहिले पाहिजे त्याच बरोबर नागरिकांनी संविधानिक जबादा -या जाणून घेतला पाहीजेत असे आवाहन राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी केले .

oplus_131074

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांचा वतीने स्वर्गिय धनराज नहार व्याख्यानमालेत ‘ लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही : संविधानिक जबाबदा-या आणि वास्तव ‘ या विषयावरील व्याख्यानात झगडे बोलत होते .
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा .डॉ . दिपक गायकवाड होते . उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक , रमेश कर्नावट , पांडुरंग थोरात , विजेंद्र गद्रे , साधना शितोळे आदी यावेळी उपस्थित होते .
झगडे यावेळी म्हणाले की लोकशाहीचा गाभा म्हणजे नागरिकाचा मता प्रमाणे कारभार चालला पाहिजे .
लोकप्रतिनिधी हे नागरिकाचे प्रतिनिधी आहे . लोकशाहीत नोकरशाहीची गरज आहे . ही नोकरशाही प्रगल्भ , निस्पृह व कोण्याचाही दबावाला बळी पडणारी नसावी. नोकरशाहीला कर्णापेक्ष्या आधिक कवचकुंडले दिली आहेत .


राजकारण्यांकडून चूकीचे होवू नये हे पाहण्याची जबाबदारी नोकरशाहीची आहे. ही जबाबदारी मागील ७० वर्षात नोकरशाहीने पाळली का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .
आधिकारी जनतेला , कायदाला अपेक्षित काम करु शकतो . पण कोणी म्हणत असेल की मला काम करु दिले जात नाही तर हा पळपुटेपणा आहे .नोकरशाही कांगावा करतात की आम्हाला काम करु दिले जात नाही .
नोकरशाहीचा कांगावा नागरिकांसमोर आणला पाहीजे असे झगडे म्हणाले .


एखादे चूकीचे काम करण्यासंदर्भात कोणी दबाव आणत असेल तर प्रांजल पणे काम करणार नाही असे सांगितले पाहीजे बदलीस घाबरुन कांगावाखोरी करु नये. बदलीस घाबरु नये ज्या आधिका-यांच्या बदल्या होतात ते आधिकारी लोकांना हिरो का वाटतात असा प्रश्न ही झगडे यांनी उपस्थित केला . कृत्रिम बुध्दिमत्ता व चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे नोकरी व व्यवसाय यावर परिणाम होणार आहेत.सध्या नउ लाख औषधांची दुकाने असून कोट्यावधी रुपयेची औषध विक्री या दुकानातून होते. ऑनलाईन औषध विक्री सुरु झाल्यावर औषध विक्रेत्यांचा रोजगारावर गदा येणार नाही का असे ते म्हणाले .


छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते . आता रयत राजा झाली आहे . लोकप्रतिनिधी व नोकरशाही यांची जबाबदारी व कर्तव्ये जाणून घेवून रयतेने लोकप्रतिनिधी व नोकरशाही कोठे चूकतात हे ठामपणे विचारले पाहीजे .
नोकरशाही म्हणजे सरकार नाही . लोकप्रतिनिधी व त्यांनी केलेली व्यवस्था म्हणजे सरकार . व्यवस्था बदलण्यासाठी नागरिक म्हणून तुम्ही काय करता असा प्रश्न त्यांनी विचारला . खासदार व आमदारांना लोकशाही आहे का ते त्याचे मत व्यक्त करु शकतात का. एखाद्या कायदा त्यांना पसंत नसेल तर त्या विरोधात ते मतदान करु शकतात का .व्हिप प्रमाणे त्यांना मतदान करावे लागते तिथे लोकशाही थांबते .
तेथे सत्ताधारी व विरोधी पक्षाला वाटते तेच  ठरते . तुमच्या लोकप्रतिनिधी जर तुमचे मत मांडू शकत नाही ती लोकशाही आहे का असे झगडे म्हणाले .छत्रपती शिवाजी महाराज राजे असले तरी ते लोकशाही वृत्तीचे , लोकशाही पध्दतीने वागणारे , माननारे नेते होते .
प्रास्ताविक मोहम्मद पटेल यांनी केले पाहुण्याचा परिचय बाबाजी गलांडे यांनी करुन दिली . तर सूत्रसंचालन शहाजी पवार यांनी केले .नोटरी किरण आंबेकर यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button