राष्ट्रीय

घोड धरणातून होणारी साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजना रद्द करावी

शिवसेना ( ठाकरे) चे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार यांची मागणी . शिरुर मधील शेती व एमआयडीसीच्या पाण्यावर परिणाम होण्याची व्यक्त केली भीति

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेचा शिरूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यावरती आणि रांजणगाव एम.आय.डी.सी वरती परिणाम होणार असून ही साकळाई पाणी पुरवठा योजना रद्द करावी अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) चे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार यांनी केली आहे .
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा, निर्वी, चिंचणी, शिंदोडी, गुनाट, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी अशा अनेक गावावरती आधीच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तालुक्यात तुटवडा येतो. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. साकळाई योजना जर झाली तर याचा परिणाम शेतीवर आणि एम.आय.डी.सी चा माध्यमातुन स्थानिक लोकांना जो रोजगार मिळतो त्याच्यावरती होईल. जलसंधारण मंत्री एका जिल्ह्याचे नसून ते पुर्ण महाराष्ट्र राज्याचे आहे .असे म्हणत शेलार यांनी ही साकळाई योजना रद्द करावी अशी मागणी केली.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्ज माफी साखरपुडा आणि लग्नासाठी पाहिजे असे बेताल वक्तव्य केले .
जगाचा पोशिंदा शेतकरी राजाची थट्टा आहे. कृषीमंत्र्यांचे डोक ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडला आहे. व्यक्तव्याचा शिवसेनेचा वतीने जाहिर निषेध करत इथुन पुढे कृषी मंत्र्यांना शिरूर तालुक्यामध्ये येवुन देणार नाही. असा इशारा ही दिला आहे .
या दोन्ही घटने बद्दल पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विधान परिषद आमदार, कामगार नेते सचिन भाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख म अशोक खांडेभराड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
चौकट
साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजने अंतर्गत शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी , चिखली सह ३२ गावाना पाणी देण्याचा मानस असून त्याकरीता धरणातील १ . ८ टीएमसी पाणी लागणार असल्याचे शेलार यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button