Uncategorizedविशेषसामाजिक
माझ्या खुशीसाठी… एक विशेष आईचे हृदयस्पर्शी पत्र
आजही आठवतो तो क्षण 15 मार्च 2023 आपल्या शाळेचा वर्धापन दिन…. सगळे त्या दिवशी किती आनंदी होते शाळेचे सर्व पालक, विद्यार्थी, हितचिंतक,संस्थेचे सहकारी,स्नेही आणि उपस्थित मान्यवर..तो एक सोहळा होता कायमस्वरूपी सर्वांच्या आठवणीत राहणारा.
दरवर्षी हा दिवस साजरा करताना खूप उत्साह असायचा पण त्यादिवशी खुश तू तो सोहळा कायमस्वरूपी प्रत्येकाच्या आठवणीत राहील असा साजरा करून गेली.माझ्या आयुष्यातून तो दिवस, ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही
आजही तो क्षण तो दिवस आहे तसं डोळ्यासमोर येतो.त्यादिवशी का कोण जाणे पण मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी कार्यक्रमच्या वेळेपर्यंत खूप अस्वस्थ होते, आई म्हणून त्या दिवशी माझी अवस्था वेगळीच होती, खरं तर कार्यक्रम मध्ये तुला न्यायचं, सगळ्यांमध्ये बसवायचं, का तर सतत तुझ्याजवळ माझं लक्ष राहावं म्हणून…मला वाटलंच नाही तो तुझ्या आणि माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण असेल म्हणून
खरं तर त्या आधी तू खूप आजारी पडायची, खूप त्रास व्हायचा बाळा तुला. कित्येक वेळेस तू दवाखान्यात जाऊन परत मागे यायचीस. पण, तुझ्यातील सहनशक्ती, ऊर्जा पाहिलं की मला असं वाटायचं होईल ठीक.खरं तर तू खूप वेदनेतून जात होती, प्रचंड त्रास सहन करत होती आणि आई म्हणून मी रोज ते पाहत होते पण तुझ्यासाठी काहीच करू शकत नव्हते, प्रयत्न सोडून माझ्या हाती दुसरं काहीच नव्हतं.खरं तर कोणत्याच आईला वाटनार नाही की आपल बाळ आपल्यापासून दूर जावं पण तुझ्या वेदनेकडे पाहिल्यानंतर कदाचित त्या वेदनेतून तू मुक्त होणं गरजेचं होतं
आई म्हणून आजही माझी तीच अवस्था आहे तू गेली पण खरं तर माझ्या आयुष्याचा प्रवासच वेगळा चालू झाला आहे. एक क्षण पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्या आठवणी शिवाय राहू शकत नाही ,सतत तुझी उणीव मला जाणवते ,तुझा सहवासाची पोकळी जाणवते, कुठेतरी तू आहे माझ्याकडे बघत असेल ,तुझी ती नजर ,तुझं ते गोड हसणं सगळं कसं मी खूप मिस करते
आज जाऊन तुला तीन वर्षे होतील पण का कोण जाणे मी मात्र आहे तिथेच आहेआजही त्या कार्यालयाच्या बाजूला गेले तरी मला खूप गहिवरून येते बाळा

तीन वर्षे झाली पण मी अजून त्या कार्यालयात पाऊल टाकू शकले नाही,खूप प्रयत्न केला ग त्यातून बाहेर येण्याचा त्या गोष्टींकडे सकारात्मकतेने बघण्याचा पण ते शक्य होत नाही आणि मग त्यावेळी फक्त एकच जाणवते की माझ्यातली आई मला थांबवते. तुम्ही विशेष मुली म्हणून माझ्या आयुष्यात आलात…माझी स्वप्नच वेगळी होती खरं तर मी नॉर्मल मुलं म्हणून तुम्हाला सांभाळले सहा वर्ष..पण वयाच्या सहाव्या सातव्या वर्षानंतर तुमची डिसॅबलिटी समोर आली,माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता हा,स्वतःला सावरायचं होतं, समजवायचं होतं आणि तुमची काळजी घ्यायची होती. मी हे सगळं स्वीकारलं पण होतं ,नियती प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात वेगवेगळे

विचार करतो ते कदाचित कृतीतून उतरत असतं आणि माझ्या बाबतीत ही तेच झालं.माझी वेदनाच खूप मोठी होती ,की ज्यामुळे आई म्हणून मला खूप दिवसापासून व्यक्त व्हायचं ठरवलं होतं, पण मला कधी व्यक्तच होता आले नाही ,तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या माझे आयुष्याच बदलून गेलं
खर तर तुम्हीच माझ्या जीवनात एक सुंदर स्वप्न बनून आलात आणि त्यानंतर मी कधी आजपर्यंत स्वप्नच पाहिलं नाहीत, तुम्हाला छान आणि सुखकर आयुष्य जगता यावं इतकाच माझा छोठसा प्रयत्न असायचा.मी देवाला कुठे पाहिलं असेल तर ते मी तुमच्यात पाहिलं तुमची काळजी घेणं ,तुम्हाला भरभरून प्रेम देणं,तुमच्याबरोबर छान आयुष्य घालवणं, तुमची सेवा करणे हीच माझी नित्य पूजा होती आणि आहे ह्याच्यात मी कधीही एक तीळ मात्र ही कधी उणीव जाणून दिली नाही किंवा कमी पडले नाही.मला माहिती होतं माझा संघर्ष खूप मोठा होता ,पण मला त्याच्याकडे सकारात्मकपणे पाहायला आणि जगायला तुम्ही शिकवलं
खरं तर मुलं जशी मोठी होतात तसं त्यांच आयुष्य ही बदलत असते, पण माझ्या सारख्या अनेक विशेष मुलांच्या आई ज्यांची स्वप्न आहे तशीच जागेवर राहिली ,कारण मी तुम्हाला कधी मोठ झालेल पाहिलंच नाहीलहान बाळांसारखंच तुमची काळजी घेणे,तुम्हाला आंघोळ घालणे, जेवण भरवणे ,तुमचे आवरण, तुमच्याकडे लक्ष देणं हे माझं नित्यक्रम आणि आजही तसाच आहे,तू गेल्यानंतर आता ती एक जागा रिकामी झाली आहे पण मी मात्र त्या सर्व आठवणीतच आहे अजून,तुमच्या असण्याची मला इतकी सवय झाली आहे की तुमच्या नसण्याचा मी विचारच करू शकले नाही
पण आता मला त्या गोष्टीची जास्त जाणीव होती की मला तुमच्याशिवाय जगणं किती कठीण आहे छकुली दीदी पण सतत आजारी असते, तिची खूप काळजी घ्यावी लागते आणि तिला ही तिचा वेळ देतीये ,तिच्याकडे पाहिलं तर जाणवते तिलाही खूप त्रास होत आहे,नियतीने काही गोष्टी आधीच ठरवून ठेवल्या आहेत,ते मला माहितीये पण त्या स्वीकारून पुढे जाणं हे मात्र मला खूप अवघड आहे ,तुम्ही दोघी सोबत असतानाचा प्रवास आणि तुमच्या नंतरचा प्रवास याचा विचार करने शक्य नाही
खरंतर आजचा दिवस आणि ही वेळ माझ्यासाठी जरी खूप वाईट असली तरी तुझ्यासाठी ही खूप चांगली आहे..की ज्यामुळे तू तुझ्या वेदनेतून, त्रासातून कायमची मुक्त झालीस, एक नवीन आणि छान आयुष्य जगण्यासाठी…..तुला छान सुंदर, निरोगी आयुष्य मिळावं,तुला छान जगता यावं हेच परमेश्वराकडे मी मागत राहिल
खरं तर माझ्या आयुष्यात तुम्ही आल्यानंतर जरी मी तुम्हाला खूप चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शारीरिक वेदना खूप होत्या, त्यातून तुम्हाला जायला लागत होतं,आज त्या सर्व वेदना व त्रास संपला.माझ्यासारख्या आईला मात्र याच्यात वेगळा काही पर्याय नाही तुमच्या आठवणीत रडत राहणार पडली तर सावरणं,आणि परत स्वतःला समजावत प्रवासाला चालत राहणार खरंतर हे नियतीचे ठरलेलं चक्र आहे त्यातून प्रत्येकाला जावं लागतं विशेष मुलांची आई होऊन एक वेगळ आयुष्य जगायला मिळाले ह्याच समाधान नेहमीच असेल
तुम्ही विशेष मुले सतत 24 तास आईजवळ असतात ,त्यामुळे आपल्या नात्याची विनच खूप घट्ट आहे जी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असतेज्यावेळी तुम्ही आमच्या आयुष्यातून जातात त्यावेळी खरं तर ती पोकळी जास्त जाणवायला लागते
तू जाताना तो दिवस15 मार्च खरं तर एक आगळावेगळा सोहळा साजरा करून गेली, कारण तू गेल्यानंतर पण शाळेच्या मुलांचे गॅदरिंग झाले, जेवणाचा कार्यक्रम झाला ,त्या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर असं कुठेच नव्हतं की आपल्या कार्यक्रमांमध्ये आपल्यातील एक खुशी निघून गेली, ते बिचारे नाचत होते ,खेळत होते, त्यांना क्षणभर या गोष्टींची जाणीव नव्हती की तू कायमची त्यांच्यातून दूर गेली आहेखरं तर त्यांच्याकडे पाहिलं तर हेच जाणवतं की असं निरागस आयुष्य आम्ही सामान्य माणसं कधीच जगू शकत नाही, तुम्ही जे जगत होता ते आम्हाला कधीच शक्य झालं नाही. निस्वार्थ भावनेने जगणं काय असतं खर तर तुम्ही मुलं आम्हाला शिकून गेलात कोणत्याही गोष्टीची अपेक्षाशिवाय जगणं हे तुम्ही मला सांगत गेलात आणि कदाचित त्याच्यामुळे आज कसली अपेक्षा न ठेवता मी आयुष्य सुंदर जगत आहे 