Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता प्रेम, आत्मनिर्भरता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत शिरूरमध्ये विविध उपक्रमांनी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या विशेष मुलांनी स्वतःच्या हातांनी बांबूपासून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून त्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळाले.
स्वतःच्या हातांनी निर्मिती केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. “विशेष मुलांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि विश्वास दिल्यास त्यांच्या हातूनही सुंदर व प्रेरणादायी निर्मिती घडू शकते,” असे राणीताई चौरे यांनी सांगितले.
समाजातील उपेक्षित घटकांना आपलेसे करणे आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला बळ देणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले.

डॉ. संतोष पोटे, तुकाराम खोले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष नीलेश जाधव, संतोष शितोळे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विशाल जोगदंड यांच्यासह प्रवीण गायकवाड, सुदर्शन दरेकर, आशिष भोजने, अविनाश घोगरे,
हर्षद ओस्तवाल, संपत दसगुडे, वसीम सय्यद, संजय काळे, अविनाश जाधव, मुश्ताक शेख, स्वप्नील रेड्डी, महेंद्र येवले, गफूर शेख, आसिफ शेख आदी उपस्थित होते.

