राष्ट्रीयविशेष

प्रत्येक क्षेत्रात संवाद कौशल्य आवश्यक : रावसाहेब चक्रे

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)“भाषण म्हणजे राजकारण नव्हे, तर प्रभावीपणे स्वंत:चे मत मांडण्याचे सशक्त माध्यम आहे,” असे मत प्रभावी वक्ता व ‘आर्ट ऑफ स्पीच’ संस्थापक रावसाहेब चक्रे यांनी व्यक्त केले.गंगा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित  ‘भाषण व सूत्रसंचालन कौशल्य कार्यशाळा’ मध्ये ते बोलत होते. यावेळी उपस्थित शिक्षकांना संवाद, भाषण व सूत्रसंचालनाचे महत्त्व, शैली आणि व्यावसायिक संधी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

“सूत्रसंचालन ही आता करिअरची दिशा बनत चालली आहे. एखाद्या क्षेत्रात सातत्याने काम केल्यास यश अटळ असते,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचे  सीईओ प्रा .डॉ . नितीन घावटे यांच्या हस्ते रावसाहेब चक्रे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी ठरले असून संवादकौशल्य ही आजच्या युगातील महत्त्वाची गरज असल्याचे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.यावेळी ज्ञानगंगा विश्व विद्यालयाच्या  शिक्षिका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button