शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)

ज्या हॉटेल/ढाब्यांमध्ये अवैध दारू विक्री करणारे किंवा शासकीय परवाना नसताना दारू विक्री करणारे सापडतील किंवा परवाना नसताना दारू पिणारे लोक सापडतील त्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येवून परवाना कायमचा रद्द करणे, तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका यांनीही “एनओसी ” रद्द करावी . प्रत्येक गावामध्ये ग्रामरक्षक दल तात्काळ स्थापन करावे ,
ज्या अधिकाऱ्यांच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत, त्या संबंधित पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी , अवैध दारू निर्मूलनासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व आदेशांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तालुकास्तरीय समिती अध्यक्ष तहसीलदार यांनी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवावा ,
दारु पिऊन शांतता भंग करणारे व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र संबंधीत व्यक्तीकडून घेण्याबाबत कायद्यातील प्रचलित तरतूदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच. सराईत गुन्हेगार व्यक्तीविरुध्द कायदयाच्या तरतूदीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलमानुसार हद्दपारी ची आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत कलम ९३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम च्या कलम ५५, ५६, ५७ ची प्रकरणे दिर्घकाळ प्रलंबित राहतात, अशा प्रकरणांची निर्गती कालबध्द स्वरुपात होईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे . सदर प्रकरणे दिर्घकाल प्रलंबित राहिल्यास तालुका समितीपुढे अशी प्रकरणे समोर आल्यास संबंधितांविरुध्द प्रशासकीय कारवाई होण्यासाठी प्रलंबित बाबींचा अहवाल त्वरित
जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावा. तालुक्यातील जी गावे अवैध दारूचे हॉटस्पॉट बनले आहेत, त्यांची यादी तयार करून त्याठिकाणी कारवाई कृती आराखडा तयार करून शासन आदेशांचे काटेकोरपणे पालन करून पूर्णतः बंदी आणावी . दारूबंदीसाठी अन्नापुर गाव विशेष विशेष मॉडल म्हणून राबवावे आणि तालुकाभर आवश्यक ठिकाणी तसा उपक्रम राबविण्यात यावा अश्या मागण्या वाळूंज यांनी बैठकीत केल्या .

