महाराष्ट्र

स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिलांविरोधात सोमवार दिनांक १५ जून रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया, वाढीव वीजबिले तसेच वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित समस्यांविरोधात शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १५) सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात शिरूर शहर व परिसरात जुन्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून, अनेक ग्राहकांनी या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप काही ग्राहकांकडून करण्यात येत आहे. तसेच बिलातील तफावत, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबतही असंतोष व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिरूर वीज ग्राहक संघटनेने महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिले आणि इतर समस्यांमुळे त्रस्त असलेल्या सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.

मोर्चादरम्यान ग्राहकांच्या मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button