Uncategorizedराष्ट्रीयविशेष

तणावाचे योग्य व्यवस्थापन केले तर जीवन अधिक सक्षम, सर्जनशील आणि यशस्वी होऊ शकते : मानसोपचारतज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी .

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}तणावाचे योग्य व्यवस्थापन केले तर जीवन अधिक सक्षम, सर्जनशील आणि यशस्वी होऊ शकते, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञडॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी केले.  येथील सनशाईन क्लबच्या वतीने डॉ. कुलकर्णी यांचे ‘ आपलं डोक फिरवतय कोण ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी बाळकृष्ण साबळे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, संदेश केंजळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मनोहर वीर, डॉ. दर्शना जेधे, आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले की तणावाचा योग्य दृष्टीकोन जीवनाला घडवतो. “घटना तणाव देते असे नाही, तर त्या घटनेला आपण कोणत्या दृष्टीने पाहतो यावर आपला तणाव ठरतो,” असे प्रतिपादन कुलकर्णी यांनी केले. विविध मानसिक ताणतणाव, त्यांचे स्वरूप आणि त्यावर उपाय याबाबत ते बोलत होते.डॉ. कुलकर्णी म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. “घटनेत ताण निर्माण करण्याची शक्ती नसते, आपल्या डोक्यातील विचार आणि दृष्टीकोन ताण वाढवतात. तणाव हा नकारात्मकच असतो असा गैरसमज दूर करताना त्यांनी सांगितले की, योग्य दृष्टीकोनातून पाहिल्यास तणाव प्रेरणादायी ठरू शकतो. “टेन्शनमुळे कृतीकडे प्रवृत्ती तयार होते. रोमांच, जागरूकता आणि निर्णयक्षमता वाढते. तणाव आणि कार्यक्षमता यांच्यात संबंध आहे,” असे त्यांनी नमूद केले.फुल टेन्शन आणि कुल टेन्शन यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले, “फुल टेन्शनमध्ये उद्दिष्ट आणि प्राधान्यक्रम दिसेनासे होतात. समस्येचे समाधान शोधण्याऐवजी इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. पण कुल टेन्शनमध्ये व्यक्ती पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत राहते. पर्याय सुचणे थांबले की टेन्शन वाढते. म्हणूनच पर्याय निर्माण करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”

डॉ. कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, आपल्या विचारांची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. “आपलेच विचार कृती हिताची आहे का हे पाहणे महत्त्वाचे. स्वतःलाच स्वतःची प्रयोगशाळा बनवा आणि आपल्या भावनांचा अभ्यास करा,” असे त्यांनी सांगितले.
भावनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, टोकाच्या नकारात्मक भावना घातक ठरू शकतात; परंतु “आकांक्षा, अपेक्षा, स्वप्ने हवीत; पण ती हवीतच असा हट्ट केला की ती मागणी बनते. लवचिकता आणि स्व स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. स्वागत डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर व अथर्व पाचुंदकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी तर आभार डॉ. शैलेजा पाचुंदकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button