विशेष

कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना शिरूर येथे विविध संस्था संघटना यांच्या वतीने अभिवादन

बाजार समितीच्या आवारात शोकसभेचे आयोजन

शिरूर येथे कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना अभिवादन करताना

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर शहरातील विविध संघटना व सामाजिक संस्थेच्या वतीने कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेत आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेचा सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सन 1975 मध्ये कार्यक्रमानिमित्त डॉक्टर बाबा आढाव शिरूर येथे आले असता त्या आठवणींचा फोटो

यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले, बाजार समितीचे माजी संचालक बंडू जाधव, रिक्षा पंचायतचे अनिल बांडे, शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे,संघपती भरत चोरडिया,व्यापारी महासंघचे नेते माजी नगरसेवक संतोष भंडारी, अजित ओस्तवाल ,परेश सुराणा , कपिल बोरा, प्रितम चंडालिया शिरूर ग्रुप विकास सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब वर्पे ,शेतकरी संघटनेचे नितीन थोरात , हमाल पंचायती चे कुंडलिकराव दसगुडे,शिवाजीराव खेमनर,
भूमिपुत्र प्रतिष्ठान चे सुशांत कुटे , बाळासाहेब आवारी, बाळासाहेब सोमवंशी, धनंजय परदेशी, आपचे अनिल डांगे, रमेश दसगुडे यासह शहरातील विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे म्हणाले की बाबानी सातत्याने सर्व सामान्यांचा विचार केला. बाबा सत्तेत जरी नव्हते तरी कष्टकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे त्याच्या पाठपुरावातून मार्गी लागले.
रवींद्र धनक म्हणाले की देश उभारणी कशी करावी हे डॉ. आढाव यांनी सांगितल. देश उभारणी करताना समाजातील शेवट च्या घटकाचा ही त्यांनी विचार केला. निर्भयतेने उभे राहणे ही बाबा आढाव यांना श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले.
रिक्षा पंचायतीचे अनिल बांडे म्हणाले की आढाव यांच्या निधनाने कष्टक-यांचा आधारवड हरपला. शिरूर येथे रिक्षा पंचायतचे काम करताना आढाव यांनी नेहमी मार्गदर्शन केले अशी आठवण बांडे यांनी सांगितली .
अजित ओस्तवाल म्हणाले की असंघटित क्षेत्रात काम करणारांचे संघटन आढाव यांनी केले. निःस्वार्थ पणे त्यांनी काम केले.त्याचे कार्य सतत स्मरणात राहील.
संतोष भंडारी, आप्पासाहेब वर्पे , नितीन थोरात ,माजी मुख्याध्यापक अशोक कर्डीले, माजी शिक्षक अशोक शेळके, आप चे अनिल डांगे आदीनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बंडू जाधव यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button