धार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूर मध्ये दिनांक 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी साडेचार ते रात्री आठ या वेळेत शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात श्रीमद् भागवत कथामृत कार्यक्रमाचे आयोजन

पंडित डॉ. काशिनाथ मिश्रा करणार कथेचे निरूपण. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

oplus_131074

शिरूर {डेली पोस्ट न्यूज 24)शिरूर शहरात अध्यात्मिक वातावरण निर्माण करणाऱ्या श्रीमद् भागवत कथामृत कार्यक्रमाचे आयोजन त्रिकाल संध्या प्रचार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हा भव्य धार्मिक उपक्रम दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय, शिरूर बसस्थानकाजवळ दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत होणार आहे.

या कथामृताचे कथाकथन पंडित डॉ. काशिनाथ मिश्रा करणार असून त्यांच्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण वाणीमधून श्रीमद् भागवताचे अमृत रसिक भाविकांना अनुभवता येणार आहे. या सप्ताहात प्रभू श्री जगन्नाथ कलशयात्रा, प्रभात फेरी, हरीनाम संकीर्तन, शंखनाद, त्रिकाल संध्या, प्रभू श्री जगन्नाथ पूजा, श्रीमद् भागवत पठण व महाप्रसाद अशा विविध धार्मिक व भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. काशिनाथ मिश्रा म्हणाले की, “भारत ही देवभूमी आहे. धर्म ही समाजाला योग्य दिशा देणारी मोठी शक्ती आहे. अनेक संकटांवर मात करूनही सनातन धर्म आजही टिकून आहे. आध्यात्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विश्व सनातन संस्थेच्या माध्यमातून भागवत कथा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

या पत्रकार परिषदेस आशा बारणे, दिलिप बारणे, राजेंद्र डोंगरे, अशोक भोसले, महेंद्र परदेशी यांची उपस्थिती होती. आयोजकांच्या वतीने शिरूर शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कथामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूरमध्ये सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे शहरात भक्ती, संस्कार व अध्यात्माची अनुभूती निर्माण होणार असून भाविकांसाठी हा पर्वणीसारखा उत्सव ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button