Uncategorized
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जुने नगरपरिषद इमारत येथे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संतोष प्रभाकर थेऊरकर यांनी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना दूरच्या ठिकाणी जावे लागत असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात रांगेत उभे राहून भरणा करताना नागरिकांना त्रास होत आहे.







