Uncategorizedराष्ट्रीय
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्रबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत.
मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून,
सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे.



