Uncategorized

बाजार समितीच्या निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटला

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी अपघात विमा योजना आणि बाजार समितीत कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना कमी दरात भोजनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी केली.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ रामलिंग येथे नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आमदार माऊली कटके,भाजपाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका हरगुडे, राजेंद्र कोरेकर, सभापती स्वाती घावटे, माजी सभापती मंगलदास बांदल, प्रकाश पवार, प्रफुल्ल शिवले, राजेंद्र जासूद, स्वप्नील ढमढेरे, सदाशिव पवार, दादापाटील फराटे, स्वाती पाचुंदकर, केशरबाई पवार , शरद कालेवार, नगरपालिका सभापती सुनील जाधव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना, कमी दरात भोजन आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. त्यांनी हवामानातील बदलांबाबतही चिंता व्यक्त करत एल निनोचा प्रभाव वाढल्यास पावसावर परिणाम होऊ शकतो, धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला. जागतिक संघर्षामुळे महागाईवरही परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले. बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आमदार माऊली कटके म्हणाले की, तब्बल नऊ वर्षांनंतर बाजार समितीची निवडणूक होत असून महायुतीतील तीनही पक्षांनी समतोल राखत उमेदवार निश्चित केले आहेत. पक्षाच्या भूमिकेपासून दूर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा देत विरोधी पॅनल शेतकऱ्यांच्या नव्हे तर स्वतःच्या हितासाठी उभे असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता नियोजनबद्ध प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे २१०० कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याचा दावा केला. राजेंद्र कोरेकर यांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी बाजार समितीच्या विकासात मोठे योगदान दिल्याचे सांगत यशवंत सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी महायुतीचे सरकार केंद्र व राज्यात असल्याने शासनाच्या माध्यमातून शेतकरीहिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविता येतील, असे सांगितले.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंगलदास बांदल, महेश ढमढेरे, दादापाटील फराटे, राजेंद्र कोरेकर आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बोऱ्हाडे यांनी केले, तर आभार मानसिंग पाचुंदकर यांनी मानले.

शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार : शशिकांत दसगुडे, विजय ढमढेरे, बापूसाहेब शिंदे, स्वप्नील गायकवाड, प्रमोद प-हाड , राहुल गवारी, संतोष शिंदे, प्रतिभा नागवडे, सुजाता नरवडे, राजेश लांडे, सुहास मलगुंडे, सागर दंडवते, संतोष मोरे, संभाजी कर्डीले आणि वैष्णव इसवे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button