Uncategorized

शिरूर पालिकेची घरपट्टी वसुली ६.३६ कोटींवर; २४४ मालमत्ताधारकांना अभय योजनेचा लाभ

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेने मार्च २०२६ अखेर घरपट्टी करापोटी ६ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची वसुली केली असून, ही रक्कम निर्धारित उद्दिष्टाच्या ५७.१७ टक्के इतकी आहे. दरम्यान, थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेचा २४४ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्यांना मिळून २४ लाख ५९ हजार १७१ रुपयांच्या दंड व व्याजाची माफी देण्यात आली.

नगरपरिषद हद्दीत एकूण १४ हजार १६६ मालमत्ता असून, सन २०२६ साठी घरपट्टी वसुलीचे ११ कोटी १३ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मार्चअखेर ६ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांचे संकलन करण्यात कर विभागाला यश आले आहे.

थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या २४४ मालमत्ताधारकांना एकूण २४ लाख ५९ हजार १७१ रुपयांची सवलत देण्यात आली.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीच्या घरपट्टी कराच्या बिलांचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील व नगरपरिषदेच्या कर विभागाचे अधिकारी माधवराव गाजरे यांनी दिली. नवीन आर्थिक वर्षात कर वसुलीला अधिक गती देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरूर शहरात एकूण ६७ शासकीय मालमत्ता असून त्याच्याकडे थकीत २६ लाख २७ हजार ८४३ रुपये व चालू रक्कम ८ लाख १७ हजार ११४ रुपये असे एकूण ३४ लाख ४४ हजार ९५७ रु. येणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button