Uncategorized
घोडनदीच्या पाणीपातळीत वाढ; शिरूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
धरणातून विसर्ग सुरू; मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षकांची नदीकाठाची पाहणी, आवश्यकता भासल्यास स्थलांतराची तयारी पूर्ण
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच धरण क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणातून घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी घोडनदीच्या पाणीपातळीत वाढ़ झाली असून, शिरूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


आवश्यकतेनुसार नगरपरिषदेचे मंगल कार्यालय, इतर पालिका शाळा तसेच खासगी शाळांमध्येही नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.




