राष्ट्रीयविशेष

कारगिल युद्धात सहभागी असणारे कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांचा कारगिल विजय दिना निमित्त डेक्कन स्कुल शिरूर चा वतीने विशेष सन्मान

शिरुर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम-24)सन -१९९९ च्या कारगिल युध्दात प्रत्यक्ष रणांगणावर लढून पाकिस्तान सैन्याला जाणारी रसद २३ दिवस रोखून धरण्याची कामगिरी करता आली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून युवकांनी सैन्यदलात सहभागी व्हावे असे आवाहन कारगिल युध्दात लढलेले सेवानिवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांनी केले.

कारगील युध्दात प्रत्यक्ष युध्दभूमीवर पराक्रम गाजविणारे शिरूर येथील गोलेगाव रोड येथे राहणारे कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांच्या विशेष सन्मान कारगील विजय दिनानिमित्त त्याच्या घरी जावून डेक्कन एज्युकेशन स्कूल इंग्लिश मिडीयम शिरूर यांच्या वतीने करण्यात आला. या सत्काराने भारावेल्या थेऊरकर यांनी कारगिल युद्धभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव कथन केले.

आज सकाळी स्कूलचे विद्यार्थी गोलेगाव रोड या ठिकाणी राहत असेलल्या थेऊरकर यांच्या घरी पोहोचले. त्याच्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनीनी कॅप्टन प्रभाकर थेऊरकर व त्यांच्या पत्नी जनाबाई थेऊरकर यांचे औक्षण केले. त्यांना पेढे भरवले व देशभक्तीपर पुस्तके , शाल, गुलाबाची फुले देवून त्याच्या सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय ‘व ‘वंदे मातारमच्या’ जयघोष केला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना व त्यांच्या प्रश्नांनाची उत्तरे देताना थेउरकर म्हणाले की कारगीलच्या युध्द भूमीवर लढताना आल व आपला विजय झाला या विजयात सहभागी होता आले. २६ जुलैला तिरंगा झेंडा फडकताना पाहता आला याचा अभिमान आणि आनंद असल्याची भावना व्यक्त केली .
कॅप्टन थेऊरकर हे कारगील युध्दाचा वेळेस 3 जुलै ते २६ जुलै युध्दभूमीवर होते . कारगिल युध्दाचा थरार व प्रत्यक्ष युध्द भूमीवरील अनुभव याची माहिती घेताना प्रत्यक्ष आपण युध्दभूमीवरच असल्याची अनूभूती विद्यार्थ्याना आली .

थेऊरकर यांनी युद्ध युद्धभूमीवरील अनुभव सांगत असताना सांगितले की कारगिल,द्रास, उरी, या भागात दुर्गम डोंगर आहेत , हवामाना बरोबरही लढाव लागत .ऑक्सिजन विरळ असते . अति थंड तापमानास सामोरे जावे लागते .

सन 1999 ला करारानुसार भारतीय सैन्य टायगर हील वरुन खाली आले होते पण पाकिस्तानने सैन्य खाली न येता त्यांनी युध्द साहित्याची जमावाजमव टायगर हिलवर केली .चार महिन्यानंतर भारतीय सैन्य पुन्हा टायगर हिल वर जात असताना पाकिस्तान सैनिकांकडून भारतीय सैन्यावर हल्ला केला.
टायगर हिलवर युद्ध सुरू झाल्यावर बोफोर्स तोफेचा मारा व विमानातून पाकिस्तान सैन्यावर बॉम्बचा मारा करण्यात आला . त्यावेळेस पाकिस्तानचे सैन्य बंकर मध्ये लपत होते. भारतीय पायदळातील सैन्य पायी टायगर हिल कडे लढत निघाले. २२ ते २३ दिवस हे युध्द चालू राहिले त्यानंतर असे ठरले की शत्रूचे रस्ते व रसद बंद करायची.
नागालॅडची फौज वरती ठेवण्यात आल्याचे थेऊरकर यांनी सांगितल.उरी सेक्टर वर कॅप्टन थेऊरकर काम करीत होते. त्यांच्यापासून पासून शत्रृ ६० मीटर अंतरावर होता .पाकिस्तान सैनिकांच्या रस्त्या व रसद बंद करण्याची जबाबदारी थेऊरकर यांच्याकडे देण्यात आली होती. विविध प्रकारचे गन सह २३ दिवस रात्र अन दिवस थेऊरकर सैन्यासह लढत होते . २३ दिवस पाकिस्तान सैन्याची रसद रोखून धरल्याचे त्यांनी सांगितले. 26 जुलैला टायगर हिलवर पुन्हा तिरंगा डौलात फडकला याचा आम्हा सर्वांना आनंद झाल्याचं त्यांनी सांगितले.सैन्यदलात मुले व मुली दोन्ही जावू शकतात असे सांगून सैन्यदलात जाण्याकरीता शरीर तंदुरुस्त असले पाहीजे .त्याकरीता नियमित व्यायाम , योग्य आहार , चांगल्या सवयी व शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी सैन्य दलात सहभागी व्हावे असे आवाहन केले .
डेक्कन एज्युकेशन स्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूरचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार म्हणाले की सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी असून कारगील युद्धातील सहभाग घेतलेले कॅप्टन थेऊरकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला हा विद्यार्थ्यांचा आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग आहे . कारगील युध्दा बाबतची माहिती ओंकार यांनी दिली. त्याच बरोबर शाळेच्या वतीने सैनिकच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कर्डेलवाडी चे तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ फरगडे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ , शिक्षिका सुनिता सरोदे , रत्नमाला महाजन , चंद्रकांत झांजे , आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button