आरोग्यराष्ट्रीय

ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की; सुरक्षेच्या मागणीसाठी अर्धा तास कामबंद आंदोलन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि. १६) सकाळी कर्मचाऱ्यांशी झालेल्या धक्काबुक्की व शिवीगाळीच्या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अर्धा तास कामबंद आंदोलन केले. रुग्णालयात सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाचे जवान नेमावेत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत माहिती देताना कर्मचारी किरण सोनवणे यांनी सांगितले की, ओपीडीची वेळ संपल्यानंतर एक इसम त्यांच्या जवळ आला. नेमके काम काय आहे, तपासणी करायची आहे का, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर शिवीगाळ करत अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे ते घाबरून गेले . अन्य कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत संबंधित इसमाला रुग्णालयाबाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप लगडे व महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष इंदुमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ नर्सेस, तांत्रिक कर्मचारी व अन्य कर्मचारी अशा एकूण २६ जणांनी कामबंद आंदोलन केले,

यावेळी गजानन टीमकरे, सुनील कोतकर, शोभा गायकवाड, रोहिणी तांदूळकर, मंगल पवार, शितल वाघमारे, गणेश हिंगे कमल मनतोडे आदी यावेळी उपस्थित होते.अशी माहिती संदीप लगडे यांनी दिली.

दरम्यान, लगडे यांनी सांगितले की, शिरूर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच येथे महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि कर्मचारी व रुग्ण दोघांच्याही सुरक्षिततेसाठी रुग्णालयात पोलीस प्रशासनाने गृहरक्षक दलाचे जवान नेमावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.प्रशासनाने याबाबत आश्वासन दिल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button