




शिरूर{ डेली न्यूज पोस्ट 24}: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने भक्तीबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला . “गणरायाच्या चरणी सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले.
या उपक्रमांतर्गत विशेष मुलींच्या सर्टिफाय हायस्कूल, पाबळ फाटा (नगरपालिका समोर) येथे तसेच न्हावरा फाटा येथील निवासी मूक बधिर शाळेत मंडळाच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण देणे आणि गणेश जयंतीचा उत्सव सामाजिक बांधिलकीतून साजरा करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या सेवाभावी कार्यातून मानवतेचा खरा अर्थ अधोरेखित होतो असे मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण जरी आपण देऊ शकलो, तरी तीच गणरायाची खरी कृपा समजतो. असे रणजित गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, माजी अध्यक्ष रणजित गायकवाड, सिंकदर मण्यार, प्रा. सतीश धुमाळ, बाळुशेठ उर्फ प्रेम मुसळे, माजी उपसरपंच गणेश खोले, सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले शक्ती ग्रुपचे अस्लम सय्यद, रवि आढाव आदी उपस्थित होते.
भक्ती, सेवा आणि संवेदनशीलतेचा संगम असलेल्या या उपक्रमातून गणेश जयंती साजरी करण्यात आली.
