शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित ‘महावीर गाथा’ या व्याख्यानमालेचे आयोजन घोडनदी येथे करण्यात आले आहे.
जैन संत व प्रसिद्ध कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून ही व्याख्यानमाला मंगळवार, दि. २४ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत पार पडणार आहे.
घोडनदी येथील पंचायत भवन, जुन्या नगरपालिकेसमोर या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात महावीरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, अहिंसा व सत्याचे तत्वज्ञान यांचे सखोल विवेचन करण्यात येणार आहे.
या व्याख्यानमालेस नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री. सकल जैन समाज, घोडनदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.