धार्मिंकराष्ट्रीयविशेष

भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त शिरूर शहरात शोभयात्रेत सर्व धार्मिय नागरिकासह जैन संत रमणिक महाराज यांचा सहभाग

oplus_131106
oplus_131106
oplus_131106
oplus_131074

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम-24}
“भगवान महावीर की जय”च्या गजरात शिरूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सर्वधर्मीयांच्या सहभागामुळे शहरात एकात्मतेचे आणि सौहार्दाचे दर्शन घडले.
कापड बाजार येथील जैन मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी लहान मुलांचे ध्वज पथक लक्ष वेधून घेत होते. त्यामागोमाग पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या जैन बांधव आणि महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. “भगवान महावीर की जय”च्या घोषणांनी आणि त्यांच्या जीवनावर आधारित गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभार आळी, आडत बाजार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक या मार्गाने मिरवणूक जैन स्थानकाजवळ पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी बिस्किटे, चॉकलेट्स व थंडपेयांचे वाटप करून भाविकांचे स्वागत करण्यात आले.

जैन संत रमणीक महाराज, सतेंद्र महाराज,संघपती भरत चोरडिया, जैन युवा परिषदचे प्रकाश बाफना, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळचे सदस्य चंदूलाल चोरडिया, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बोरा,चंद्रकांत बोरा, गोरक्षण पांजरापोळचे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा, महामंत्री वसंत गादिया, रमाकांत बोरा, देवल शहा, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, प्रितेश कोठारी, सुनील धाडिवाल, सुनील कांतीलाल बाफना, नितीन दुगड, विनोद बोथरा, अतुल बोथरा,श्रेणिक नहार ,आदी सहभागी झाले होते.जैन स्थानकाजवळ संघपती भरत चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशांत गादिया यांनी ध्वजगीत म्हटले. यावेळी जैन संत रमणिक महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाज प्रगतीसाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

सुभाष चौक येथे महावीर जयंती शोभायात्रा देखावा अंतर्गत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित आकर्षक देखावा सादर करण्यात आला. अनुष्का धन्यकुमार भटेवरा यांनी त्याची सजावट केली होती. तसेच माजी नगरसेवक विनोद भालेराव यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले, जय बालाजी ग्रुपच्या वतीने ड्रायफ्रूट चे वाटप करण्यात आले.तर जीनेद्र ग्रुपतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित ‘महावीर गाथा ही व्याख्यामाला संत व प्रख्यात कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या प्रभावी वाणीतून   २४ ते ३१ मार्चदरम्यान दररोज सायंकाळी ८ वाजता होती. आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button