राष्ट्रीय

बिबटयाला जेरबंद करण्यासाठी १००० हून अधिक पिंजरे देण्यात येणार

वनमंत्री गणेश नाईक

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24}पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटयाच्या बंदोबस्त हायटेक पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील बिबटया जेरबंद करण्या संदर्भात १२०० पिंजरे देण्यात येणार आहेत. त्यातील २०० पिंजरे देण्यात आले आहेत.बिबट निवारण केंद्रात २० बिबटे आहेत. गुजरात येथील वनतारांचे अधिकारी यांना हे बिबटे लवकर घेऊन जा असे सांगितले आहे. अन्य राज्यांना बिबटे लागत असतील तिथे ही बिबटे देण्यात येतील. आफ्रिकेत सिंह आहेत. त्याठिकाणी बिबटे नाहीत तेथे ही आपण बिबटे पाठवत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. नरभक्षक बिबट्यास दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा सूचना देण्यात आले असल्याचे नाईक म्हणाले.

  गेल्या अनेक दिवसापासून पिंपरखेड ग्रामस्थांनी वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड ला भेट द्यावी अशी मागणी लावून धरली होती .पिंपरखेड येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्यात शिवन्या बोबे ही पाच वर्षाची कन्या व रोहन बोबे वय १३ व जाबूत येथील भागुबाई रंगनाथ जाधव या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यू झालेल्या असून आता पर्यत शिरूर तालुक्यात १२ हुन अधिक जण बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले आहेत.

प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ.भाऊसाहेब पाचुंदकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक. शुभेच्छा

रोहन बोबे यांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी नाईक आले होते. रोहनचे वडील विलास व  आई माधुरी यांची भेट घेतली.यावेळी त्याच्या समवेत माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके,भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, भीमा शंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते.

 नाईक म्हणाले की पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्याच्या बंदोबस्त हायटेक पद्धतीने करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येकी ११ कोटी रु.पुणे व नगर जिल्ह्यास देण्यात आले आहे.. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले झाले आहेत. त्याकरिता आतिशय आधुनिक यंत्रणा वापरून सॅटेलाईचा व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वाघ आल्या नंतर सायरन होऊन १० ते १२ किमी अंतरातील परिसरातील लोकांना कळेल अशी यंत्रणा करण्यात आली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १२०० पिंजरे देण्यात येणार असून त्यातील २०० पिंजरे आलेले आहेत.पिंजरे कार्यान्वित असतील यासाठी वनविभागाची यंत्रणा संतर्क करण्यात आली आहे. वनतारा अधिकारीशी आजच चर्चा झाली असून त्याच्या अधिका-यांना बिबटे घेऊन जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या बिबट निवारण केंद्रात २० बिबट आहेत. अन्य राज्यांना बिबटे लागत असतील तिथे ही बिबटे देण्यात येतील. आफ्रिकेत सिंह आहेत. त्याठिकाणी बिबटे नाहीत तेथे ही आपण बिबटे पाठवत आहोत.

   बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याबद्दल दु ;ख व्यक्त करून जीवाची किंमत करता येत नाही असे ते म्हणाले . बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे देण्यात आला आहे. नसबंदी केल्या वर बिबटे कमी होतील असे ते म्हणाले.

 इकडचे बिबटे माळशेज घाट उतरून कोकणात उतरले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त केल्या नाही तर भविष्यकाळात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील अशी भीती व्यक्त करून बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडल्या त्याबाबत शासन गंभीर असल्याचे ते म्हणाले. या भागातील बिबट्याच्या बातम्या वाचल्या नंतर या खात्याचा मंत्री मी बदनाम झाल्या साठी झालो आहे असे वाटायला लागल अशी खंत त्यांनी व्यक्त केली.लोकांच्या जीव जाता कामा नये या करिता वनखात्याच्या यंत्रणा संतर्क राहणार आहे. गावा गावात वनमित्र केले जातील त्यांच्या मदतीने सतर्क राहण्याबाबत प्रयत्न केले जातील

 बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बोबे कुटुंबातील  व्यक्तीस वनखात्यात नोकरी देऊन सामावून घेण्यात येईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बिबटयाच्या प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. बिबट्याच्या बंदोबस्ता साठी सर्वांचे सहकार्य लागेल हे सहकार्य सर्वांनी करावे असे आवाहन त्यां नी केल.या भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना झाल्या आता याच्या पुढे असा घटना नको . असा घटना न होण्याबाबत वनविभागाची यंत्रणा या करिता संतर्क राहील. वाघाच्या बंदोबस्ता करिता चंद्रपूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते च्या आधारे जी यंत्रणा वापरली तशी यंत्रणा पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला व नगर जिल्ह्याला दुसरा टप्प्यात वापरली जाईल. मंत्री राधाकृष्णन विखे यांच्या शेतावर त्याचे नातवंडे खेळत असताना बिबट्याने त्याच्या वर झेप घेतली कुत्र्या मध्ये आल्याने कुत्र्यावर हल्ल्या झाला व ही मुले बचावली असे ते म्हणाले.

बोबे कुटुंबीयास रोहित जाण्याने जे दु:ख झाले त त्या दु : खात सहभागी होण्यासाठी आलो आहे. मंत्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून येथे आलो आहे असे सांगून भविष्य काळात असे प्रसंग येणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button