राष्ट्रीय
शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}.— जन्मावेळी वजन फक्त ५१६ ग्रॅम… अवयव अर्धवट विकसित… प्रत्येक क्षण धोक्यात. अशा परिस्थितीत या नवजात बाळाचा जीव वाचविणे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अक्षरशः अतुलनीय विजय. वात्सल्य हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्ना बिहाणी व डॉ संदीप गुंड यांनी अखंड परिश्रम, तज्ज्ञ उपचार आणि संवेदनशील देखभालीच्या बळावर या बालकाला नवजीवन दिले. तीन महिन्यांच्या काळजीपूर्वक उपचारानंतर बाळाचे वजन आता १ किलो ६०० ग्रॅम झाले आहे.







