क्राईम

कामगारांना रोडवर अडवून मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत 

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}कामगारांना अडवून मोबाईल फोन व दुचाकी लुटण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १.५० लाख रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

 दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारेगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील परिसरात कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून धमकावत मोबाईल फोन हिसकावल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.

गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींमध्ये निलेश चंद्रकांत पवार (वय २८, रा. भोंद्रे , कान्हूर ता. पारनेर, जि. अहिल्यानगर ), मोहन विठ्ठल भोगे (वय २८, रा. प्रीतमप्रकाश नगर,शिरूर, जि. पुणे) आणि अभिजीत चंद्रकांत पवार (वय ३५, हिवर गाव पठार, ता. संगमनेर ) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून लुटलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते संबंधित कामगारांना परत देण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील कामगारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.एमआयडीसी मधील कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , म

 उपविभागिय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, संदिप भांड यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button