राष्ट्रीय

सर्वसामान्यांशी नाळ असलेल्या,शिस्तीबरोबरच माणुसकीची ऊब जपणारे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

विशेष लेख

काही व्यक्ती पदापलीकडे जाऊन लोकांच्या मनात घर करतात.शिरूरकरांसाठी अजितदादा पवार हे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते,तर विकासाचे पालकत्व घेणारे आपलेच माणूस होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने शिरूरकर निःशब्द झाले.नेहमी गजबजलेली बाजारपेठ शांत झाली,बसस्थानकावरची वर्दळ थांबली,आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच प्रश्न दिसत होता —“हे खरंच झालंय का?”शिरूर विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.

लहान कार्यकर्त्यांपासून अनुभवी नेत्यांपर्यंत, सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा,फोनवरून, भेटीतून थेट संवाद साधणारा अजितदादा हीच त्यांची खरी ओळख होती.

शिरूर तालुक्यातील अनेक विकासकामांची पायाभरणी त्यांच्या दूरदृष्टीतून झाली.

रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, नागरी सुविधा —

या सगळ्यांत त्यांचा ठसा स्पष्ट जाणवतो.

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घेतलेली ती जाहीर सभा…

शिरूरच्या विकासाचा मांडलेला रोडमॅप…

आज मागे वळून पाहताना तीच सभा त्यांच्या आयुष्यातील

शिरूरमधील अखेरची सभा ठरेल,

याची कल्पनाही कोणाला नव्हती.

आज शिरूरच्या राजकारणातच नाही,

तर शिरूरकरांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कापड बाजार, हलवाई चौक, आडत बाजार, बसस्थानक —

दुकानांचे शटर खाली आली,

पण डोळ्यांमधील अश्रू थांबले नाहीत.

शाळांमधून विद्यार्थ्यांनी वाहिलेली आदरांजली

हेच सांगून गेली —

नेतृत्व केवळ भाषणातून नव्हे,

तर माणुसकीतून घडत असते.

पाचकंदील चौकात झालेल्या शोकसभेत

शब्द अपुरे पडत होते.

आठवणी बोलक्या झाल्या

सामान्य माणसाशी नाळ जपण्याची शिकवण,आणि निर्णयक्षम नेतृत्वाची प्रेरणा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.दादाचे नाव इतिहासा बरोबर लोकांच्या हृदयात ही कोरल गेल आहे.शिरूरकरांच्या मनात अजितदादा कायम जिवंत राहतील.प्रशासनावर घट्ट पकड, शिस्तीचा आग्रह आणि निर्णयक्षम नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी, अधिक संवेदनशील बाजूही तितकीच ठळक होती. मागील वर्षी त्यांनी आपला वाढदिवस पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मनःशांती छात्रालयातील निराधार मुलांसोबत साजरा करत ती बाजू सर्वांसमोर आणली होती. त्या वेळी अनाथ, गरजू विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजितदादा भावुक झाल्याचे अनेकांनी पाहिले होते.

अपघाती निधनानंतर शिरूरमध्ये त्यांच्या त्या भेटीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. २२ जुलै रोजी अजितदादा मनःशांती छात्रालयात आले होते. तेथील विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांना पेढे भरवत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांनी दादांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा आणि त्यागाचा गौरव केला.

संस्थेची माहिती घेताना आणि अनाथ मुलांसाठी सुरू असलेले कार्य पाहताना अजितदादांचे मन भारावून गेले होते. “मुलांसाठी काहीही गरज भासल्यास निसंकोचपणे संपर्क करा,” असे आश्वासन त्यांनी संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांना दिले होते. ही आठवण सांगताना अध्यक्ष विनय सपकाळ, प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले व यश सूर्यवंशी यांना अश्रू अनावर झाले.

याच दौऱ्यात पुणे–अहिल्यानगर मार्गावर असलेल्या सीताबाई थिटे औषध निर्माण महाविद्यालयातील विद्यार्थिनींशीही त्यांनी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना समजून घेतले. मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांना राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट देण्यात आली होती. त्या भेटीचा फोटो अजितदादांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी दिली.

शिरूर शहरातील नवीन नगरपालिका इमारत, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत यांसह विविध विकासकामे उभी राहण्यात अजितदादांचे मोलाचे योगदान राहिले आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे, उद्योगपती रसिकलाल धारिवाल, माजी नगराध्यक्ष शहीदखान पठाण यांच्या निधनानंतर संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले होते.

कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेवर पोहोचण्याचा शिरस्ता त्यांचा कायम होता. बाजार समितीच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटनासाठी दिलेल्या सकाळच्या वेळी उपस्थित राहिले होते. तालुक्यातील सहकार, औद्योगिकीकरणाशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अश्या अनेक आठवणी शिरूरकरांच्या मनात जाग्या झाल्या आहेत. सर्वसामान्यांवर प्रेम करणारा, रोखठोक आणि स्पष्ट बोलणारा, विकासकामांच्या जोरावर मते मागणारा नेता हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.नेतृत्वाच्या शिस्तीबरोबरच माणुसकीची ऊब जपणारा हा नेता शिरूरकरांच्या स्मरणात कायम राहणार आहे.  वेळेच्या काट्यावर चालणारा प्रशासक,आणि सामान्य माणसाशी नाळ जपणारा लोकनेता —

ही सगळी रूपं आज एकाच वेळी हरपली आहेत.

आज शिरूरच्या राजकारणातच नाही,

तर शिरूरकरांच्या मनात मोठी पोकळी आहे.

दुकानांची शटर खाली आली,

पण डोळ्यांमधील अश्रू थांबले नाहीत.

शाळांमधून विद्यार्थ्यांनी वाहिलेली आदरांजली

हेच सांगून गेली —

नेतृत्व हे पदाने नाही, माणुसकीने मोठं होतं.

अजितदादा गेले,

पण त्यांच्या विचारांची जबाबदारी

आता समाजावर आहे.

त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग,

सामान्यांशी संवाद साधण्याची पद्धत,

आणि निर्णयक्षम नेतृत्वाची प्रेरणा

हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

 काही नावं इतिहासा बरोबर

लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी कोरली जातात.

शिरूरकरांच्या मनात

अजितदादा पवार कायम जिवंत राहतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button