राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हास्तरीय दहावे त्रैवार्षिक अधिवेशन येत्या ९ मे रोजी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे होणार असून, राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांवर या अधिवेशनात व्यापक चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रातील क्रांतिसिंह नाना पाटील आणि गोदावरी परुळेकर यांनीही राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते. सध्या डॉ. अशोक ढवळे हे राष्ट्रीय अध्यक्ष, तर डॉ. अजित नवले हे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, दुधाला हमीभाव, पीकविमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण यांसारख्या विविध प्रश्नांवर किसान सभेने राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.







