अपघात

दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील 

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर तालुक्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांचा, तर सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतीदिनानिमित्त डेली न्यूज पोस्ट 24टीम च्या वतीने विनम्र अभिवादन

शिरूर-पुणे-अहिल्यानगर बायपासवरील अपघातात दोघांचा, तर शिरूर-सातारा राज्य महामार्गावरील कर्डे येथे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहराजवळील पुणे-अहिल्यानगर बायपास रस्त्यावर हॉटेल संग्रामजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. वाडेगव्हाण (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील किशोर नामदेव यादव (वय ३८) हे इंडिवर मोटारीतून अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी इंडिवरला कंटेनरने धडक दिली. या धडकेनंतर इंडिवरची अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला धडक झाली.

दरम्यान, रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीलाही या वाहनाची धडक बसली. या अपघातात इंडिवरमधील किशोर यादव यांचा तसेच दुचाकीवरील प्रकाश लाड (वय ३१, रा. पलूस, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, दुसरा अपघात शिरूर-सातारा राज्य महामार्गावर कर्डे येथे झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सोमनाथ नंदू चव्हाण (वय २५, रा. घारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला.

दोन्ही अपघातांप्रकरणी शिरूर पोलिसांनी नोंद घेतली असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान शिरूर बायपास रस्त्यावर पाषाण मळा याठिकाणी यापूर्वी ही अपघातात अनेक जणांना प्राण गमावावे लागले आहेत. काही महिन्यापूर्वी येथील डिव्हाडर बंद करण्यात आला होता. परंतु थोड्याच दिवसात तो बंद डिव्हायडर पुन्हा चालू झाला. अनेकांच्या मृत्यू होऊन ही अपघात रोखणारी कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही हे मोठे दुर्देव आहे. आणखी किती जणांचे बळी गेल्यावर येथे कायमस्वरूपी उपाययोजना होणार हा प्रश्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button