महाराष्ट्र

शिरूर बायपास रस्त्यावर  ३८ बॅरिगेट; शिरूर पोलिसांची तातडीची उपाययोजना

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी शिरूर पोलिसांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतीदिनानिमित्त डेली न्यूज पोस्ट 24टीम च्या वतीने विनम्र अभिवादन

अपघातप्रवण ठिकाणी असलेले अनधिकृत डिव्हायडर कट बंद करण्यासाठी एकूण ३८ बॅरिगेट सुरक्षितपणे लावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.

दि. ११ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीतील हॉटेल संग्रामसमोर चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत प्रथमेश प्रकाशराव लाड (वय ३०) आणि किशोर नामदेवराव यादव (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली.

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे–अहिल्यानगर महामार्गावर यापूर्वीदेखील विविध ठिकाणी वारंवार गंभीर अपघात झाले आहेत. अनेकदा वाहनचालकांकडून अनधिकृत डिव्हायडर कटचा वापर करून चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडला जात असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुढाकार घेत हॉटेल संग्रामसमोर ७, गंगा पेट्रोल पंपासमोर ११ आणि कोळपे हॉस्पिटलसमोर २०, अशा एकूण ३८ बॅरिगेटची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अनधिकृत कटमधून वाहने वळविण्याचे प्रकार कमी होऊन महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, ही उपाययोजना सध्या तात्पुरत्या स्वरूपाची असून, अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महामार्गावरील अनधिकृत कट, दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था, रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतूक नियमन याबाबत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button